आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गोड पदार्थ हे सगळ्यांनाच आवडतात तर अनेकांना जेवणाच्या आधी काहीतरी हलकं खाण्याची सवय असते. तर अनेकजण जेवणाच्या आधी गोड पदार्थ खातात. पण जेवणाच्या आधी गोड पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्याला धोका पोहचू शकतो. त्यामुळे जेवताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊ करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
जेवताना आपल्या जेवणात गोड पदार्थ असतात. मात्र, काही वेळा आपण प्रथम गोड पदार्थ खाण्यावर भर देतो. ते चुकीचे आहे. मसालेदार भोजनाच्यावेळी सुरुवात गोड पदार्थाने करु नये. साधे भोजन करताना प्रथम भात, चपाती, भाजी, दही, ताक, रायता असा क्रम असावा त्यानंतर गोड पदार्थ खावा.
तुम्हाला जर जेवणानंतर गोड पदार्थ खावा वाटला तर तुम्ही एक सोपा उपाय करू शकता यामुळे तुमच्या आरोग्याला काही हानी पोहचू शकता नाही. त्यासाठी तुमचे जेवण झाल्यानंतर दुधावर आलेली मलई जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीरातील अनेक रोग नष्ट होण्यास मदत होईल.
जेवण झाल्यानंतर तुम्ही खजूर खा. यामुळे तुमच्या शरीरात प्रोटीन जातील आणि तुमचे आरोग्य सुदृढ राहील. त्यामुळे जेवणाच्या आधी काहीही गोड न खाता जेवणानंतर गोड पदार्थ खा. यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील.
- गरोदर माता आणि गर्भातील बाळावर ‘म्युझिक थेरेपी’ द्वारे होणार संशोधन
- वेळेवर औषधे न देणाऱ्या पुरवठादारांवर मेस्मातंर्गत कारवाई करा
- चिंचेचा ‘हा’ फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा
- दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- ससून रूग्णालयात ‘कोडा’वर अधुनिक वैद्यकीय व सर्जिकल उपचार उपलब्ध
- ‘ट्रॉमेटिक ब्रेन इंज्युरी’मुळे रूग्ण जाऊ शकतो ‘कोमात’, ही आहेत लक्षणे
- रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा