आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केळी, बटाटा, वांग्यासह अनेक अशा भाज्या आणि फळे आहेत जी कापल्यानंतर थोडावेळातच काळवंडतात. ज्यामुळे चवसुद्धा बिघडते. परंतु ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत जे केल्याने भाज्या आणि फळे काळवंडणार नाहीत.
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
लिंबू रस –
भाजी कापल्यानंतर ती पाणी आणि लिंबू रसाच्या मिश्रणात टाका. यामुळे भाजी काळी पडणार नाही.
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
व्हिनेगर –
व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही भाज्या काळवंडण्यापासून वाचवू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर टाकून मिश्रण तयार करा. भाजीसाठी कच्ची केळी किंवा वांगी कापल्यानंतर या पाण्यात ती भाजी टाका. असे केल्याने केळे आणि वांगी काळवंडणार नाहीत.
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
बेकिंग सोडा –
बेकिंग सोड्याचा वापर अनेक वस्तूंमध्ये केला जातो. याशिवाय भाज्या काळवंडू नयेत यासाठी सुद्धा बेकिंग सोडा खुप लाभदायक ठरतो. यासाठी पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून मिश्रण बनवून घ्या यामध्ये कापलेली भाजी टाकून ठेवा. यामुळे भाज्या फ्रेश राहतील आणि काळ्या पडणार नाहीत.
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या