आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याकडे कडुनिंब हे कुठेही सहज उपलब्ध होते. आणि त्याची पाने ही कडवट असतात. पण ती आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. कडुलिंबाची पाने कडवट असाली तरी ते अनेक आजारांना दूर ठेवतात. त्यामुळे आपण कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे जाणून घेवू.
कडुनिबांच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे खालीलप्रमाणे :
१) कडुलिंब हे तोंडाच्या दुर्गंधीला मारक असते. कडुनिबांच्या पाण्याने अंघोळ केली तर तोंडाच्या दुर्गंधीची समस्या सुटेल.
२) कडुलिंबाच्या पाण्यात औषधी तत्व असते. आपल्या डोळ्याच्या आजूबाजूला असणारे त्रासदायक बॅक्टरीया या पाण्यामुळे आपोआप मारले जातात. त्यामुळे आपले डोळे निरोगी होण्यास मदत होते.
३) कडूलिंबाच्या पानात बॅक्टेरिया दूर होतात. त्यामुळे आपल्या डोळ्याबरोबरच काखेतील बॅक्टोरिया ही मारले जातात. त्यामुळे आपल्या शरीरावर असणारी दुर्गंधी दूर होते.
४) कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या केसातील कोंडा दूर करण्यास मदत होते. आणि या पाण्याने अंघोळ केल्याने डोक्यातील खाज दूर होते.त्यामुळे कडुनिंबाची पाने ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
५) कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेला आलेली खाज दूर होण्यास मदत होते, त्वचा निरोगी होते. त्यामुळे त्वचेच्या समस्या असतील तर तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ करू शकता.