आरोग्यनामा ऑनलाइन टीम : पावसाळ्यात अनेकांना काविळीची समस्या होते. याचा वाईट परिणाम लिव्हरवर पडतो. काविळीचे संकेत मिळताच वेळीच उपाय केले तर हा आजार नियंत्रणात येतो.हिपॅटायटिस अ आणि हिपॅटायटिस इ नामक व्हायरसमुळे हा आजार होतो. हे चुकीचे पदार्थ खाणे किंवा पाणी प्यायल्यामुळे पसरते. जास्त दारू,अॅसिडिटी, जास्त मसाल्याचे पदार्थ किंवा मलेरियामुळे कावीळ होऊ शकते.
गडद पिवळ्या रंगाची युरिन होणे, पांढऱ्या रंगाचे स्टूल (शौच) येणे, अचानक वजन कमी होणे, पोटदुखी, दीर्घ काळ थकवा राहणे, त्वचा आणि डोळ्यांमधील पिवळेपणा, उलटी येणे किंवा त्वचेमध्ये खाज येणे ही काविळीची लक्षणे आहेत.काविळीवर घरगुती उपाय करण्यासाठी कापलेल्या कांद्यामध्ये लिंबाचा रस, काळे मीठ आणि मिरपूड टाकून सकाळ-संध्याकाळ खावे.
दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळ-संध्याकाळ एक कप आवळ्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून प्यावे. तसेच रोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास टोमॅटोच्या ज्यूसमध्ये मीठ आणि मिरपूड मिसळून प्यावे. रोज सकाळ-संध्याकाळ ४-५ तुळशीची पाने चावून खावी. सकाळ-संध्याकाळ मुळा आणि याच्या पानांचा रस प्यावा.काळे मीठ आणि मिरपूड टाकून मुळा खावा. रोज पपई खावा किंवा पपईच्या पानांचा रस प्यावा. दिवसा २ किंवा ३ वेळा लिंबू-पाणी प्यावे.