आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळा चालू झाला की लगेच सर्दी, खोकला, घसा दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी अनेक उपाय आपण करत असतो पण याचा काय चांगला परिणाम आपल्याला मिळत नाही. तर आज आपण अशा उपायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला आयुर्वेदात खूप महत्त्व दिले आहे.
जलनेती हा एक चांगला उपाय आहे. जलनेती कारण्यासाठी कोमट मीठ टाकलेल्या पाण्याचा वापर करावा. जलनेतीच्या पाण्याने नाकाची सफाई केली जाते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, खोकला पासून बचाव करू शकता. जलनेती करण्यासाठी पाण्याला नेति पात्रामध्ये घेऊन हा प्रयोग करू शकता. जलनेती दिवसभरात कधीही करू शकता.
अर्ध्या लीटर कोमट पाण्यात आर्धा चमचा मीठ मिसळून हे पाणी नेती पात्रात घ्या. आता कमरेच्या खाली वाकून मान एका दिशेला वाकवावा आणि नेती पत्राने नाकाच्या एक छिद्रात पाणी टाकत दुसऱ्या छिद्रातून पाणी बाहेर काढावे. अशीच प्रक्रिया दुसऱ्या दिशेत करा.
नाकात पाणी टाकत असताना हळूवार पणे पाणी टाका आणि या प्रक्रियेवेळी तोंड उघडे ठेवा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नाकाचे योग करा. यामुळे नाकातील पाणी, किटाणू बाहेर येण्यास मदत होते.