आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेली जीवनशैली, वाढलेला कामाचा व्याप, प्रचंड धावपळ या सर्वाचा परिणाम म्हणजे माणसाची सहन करण्याची पातळी कमी होत चालली आहे. प्रत्येक गोष्टीत तडजोड करावी लागत असल्याने व मनाविरूद्ध होत असल्याने तसेच नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागत असल्याने सहनशक्ती अपुरी पडू लागली आहे. अशावेळी मनाचा उद्रेक होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१. सिग्नलला थांबणे सुद्धा लोकांना त्रासदायक वाटू लागले आहे. हे सुद्धा सहनशक्ती कमी झाल्याचे चिन्ह आहे. अशावेळी काहीजण उगाचच हॉर्न वाजवतात तर काहीजण सिग्नल तोडायचा प्रयत्न करतात.
२. सहनशक्ती संपल्याने तडजोड करणे मनाला पटेनासे झाले आहे. यामुळे कित्येक जोडपी संकटात सापडलेली असतात.
३. आत्मप्रौढी, तडजोड न करणे, जोडीदारावर अविश्वास, संशय अशा अनेक घटकांमुळे जोडप्यांमध्ये तणाव दिसून येतो.
४. कामाच्या ठिकाणी विनाकारण होणारी स्पर्धा सुद्धा अनेक समस्या निर्माण करते. यामुळे काहीजणांमध्ये न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना निर्माण होते.
५. आनंदी जगण्यासाठी इतर व्यक्तीच्या कामावर आपली प्रतिमा, आनंद, समाधान, मनस्थिती अवलंबून ठेवू नका. सहनशक्ती वाढवा.