आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बाळांतपणानंतर एखाद्या अभिनेत्रीने वजन कसे कमी केले, याच्या सुरस कथा आपण नेहमीच पहात आणि ऐकत असतो. परंतु, याचा परिणाम तुमच्यावर जास्त होऊ देऊ नका. कारण बाळंतपणानंतर लगेच वजन घटवून अतीश्रम करण्याची घाई आरोग्याला घातक ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
हे लक्षात ठेवा
१. लगेच वजन कमी करण्याच्या घाईचा आईसह बाळाच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो.
२. मूल अंगावर पीत असताना डाएट, जीम, खाणे कमी करणे टाळा. यामुळे बाळाचे पोषण व्यवस्थित होत नाही. तसेच आईवरही परिणाम होतो.
३. केवळ दिसणे हे सौंदर्य नसते तर बाळांतपणाने झालेली शरीराची झीजही भरुन येणे गरजेचे असते.
४. वजन वाडेल या भितीने पौष्टिक अन्न टाळू नका. आराम टाळू नका, अती व्यायाम करू नका. अन्यथा पचन बिघडू शकते. हाडे कुरकुर करू शकतात.
५. दुध भाकरी, खिचडी, तूप, जवसाची चटणी खा. सूर्यनमस्कार घाला. कारण या पारंपारिक गोष्टी खुप लाभदायक आहेत.
६. आधुनिकतेच्या नावाखाली पारंपरिक आहारविचार बाजूला ठेवू नका.