आरोग्यनामा ऑनलाईन टीम – Takachi curry | पावसाळ्यात दही, ताक, कढी खायची की नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यावर आहारतज्ज्ञ काय सांगतात, जे जाणून घेणे यासाठी महत्वाचे आहे. (Takachi curry) दही, ताक आणि कढी तिघांचेही मूळ दहीच आहे. परंतु, पावसाळ्यात कढी खाणे कधीही चांगले. कारण दह्यासोबत बेसनाचेसुद्धा पोषकतत्व मिळतात. हे दोन्ही एकत्र केल्यास जास्त प्रोटीन, आयर्न आणि फायबर मिळते. पावसाळ्यात कढी खाणे फायदेशीर आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
हे आहेत फायदे
१) पावसाळ्यात कढी प्यायल्यास थकवा दूर होतो.
२) यातील फॉस्फरसमुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
३) त्वचा चांगली राहते. कारण बेसनमुळे शरीरात कोलेजन बनते.
४) कढी अँटीइंफ्लेमेटरी असते. यातील फॉलेट आणि व्हिटॅमिन बी६ गरोदर महिलांसाठी शक्तिवर्धक ठरते.
५) लो ग्लायसेमिक इंडेक्सच्या श्रेणीमध्ये येते असल्याने मधुमेह रुग्णसुद्धा खाऊ शकतात.
ताकसुद्धा घेऊ शकता
आहारतज्ज्ञ सांगतात, कढी न मिळाल्यास पावसाळ्यात दुसरा पर्याय म्हणून तुम्ही ताक खाऊ शकता. दही पचवण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळेत ताक पचते. लो कॅलरी आणि फॅटही लो असते. प्रोटीन यामध्ये चांगले असते. ताकामध्ये कच्ची उकडलेली केळी खाल्ल्यास पैष्टीक आहे.
दहीसुद्धा खाऊ शकता
आहारतज्ज्ञ सांगतात, कढी अथवा ताक न मिळाल्यास पावसाळ्यात तिसरा पर्याय म्हणून दही खाऊ शकता. कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी, गुड बॅक्टेरियासारखे गुण असलेले दही ब्लडप्रेशर कमी करते. हे खाल्ल्याने मूड चांगला होतो. बुद्धी तल्ल्ख होते.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे