आरोग्यानामा ऑनलाइन टीम : शरीराला लोहाची म्हणजेच आयर्नची खूप गरज असते. शरीरातील हा महत्वाचा घटक आहे. याची कमतरता निर्माण झाल्यास विविध त्रास सुरू होतात. यामुळे लोह शरीराला ज्या पदार्थामधून मिळते असे पदार्थ नियमित खाल्ले पाहिजेत. जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. शरीरातील लोहाची ही कमतरता भरून काढायची असेल तर टॉमेटो हा उत्तम पर्याय आहे.
टोमॅटो एक भाजी असली तरी त्यामध्ये अनेक पौष्टिक गुण आहेत. यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस आणि अन्य अनेक पौष्टिक तत्व भरपूर असतात. टोमॅटो खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.दररोज २०० ग्रॅम टोमॅटोचा रस प्यायल्यास अॅनिमियामध्ये खूप फायदा होतो. वजन कमी असणाऱ्यांनी जेवणाच्या वेळी शिजवलेले टोमॅटो खाल्ल्यास त्यांचे वजन वाढते.
टोमॅटो खाल्ल्यामुळे तोंडात येणारे फोड बरे होतात. तसेच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते. उन्हाळ्यात सारखी तहान लागत असेल तर २०० ग्रॅम टोमॅटोच्या रसात दोन तीन लवंगाचे चूर्ण मिसळून हा रस प्यावा. खूप फरक पडतो. तसेच टोमॅटोचा रस सकाळ-संध्याकाळ प्यायल्यास दातांतून रक्त येण्याची समस्या दूर होऊ शकते. भूक लागत नसेल तर २०० ग्रॅम टोमॅटोच्या रसात अद्रकाचा आणि लिंबाचा रस मिसळून प्यावा. यामुळे भूक लागते. टोमॅटोच्या रसात नारळाचे तेल मिसळून मालिश केल्यास खाजेची समस्या बरी होते.