आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा आजार कोणत्याही वयात शरीराला जडू शकतो. हा आजार टाळण्यासाठी वेळोवेळी रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. अनेक वर्ष रक्ताची तपासणी न केल्यामुळे मधुमेह असल्याचे समज नाही आणि उपचाराअभावी गंभीर परिणाम सोसावे लागतात. मात्र, मधुमेह असल्याचे समजल्यास घाबरून जाऊ नका. हा असाध्य आजार नसून नियमित दिनचर्या आणि योग्य उपचाराद्वारे त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. मात्र या आजाराबाबत तुम्हाला सखोल माहिती असणे आवश्यक आहे.
* डायबिटीसमुळे बहुमुल्य आयुष्यातील ५ ते १० वर्ष कमी होतात.
* मधुमेहाच्या रुग्णांना फ्ल्यू-निमोनियाचा धोका जास्त असतो.
* मधुमेहामुळे दातांचे नुकसान वाढते, हिरड्यांवर सूज येते.
* नाशपातीसाख्या आकाराचे शरीर असलेल्या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका त्या लोकांच्या तुलनेत कमी असतो, ज्यांचे शरीर सफरचंदाच्या आकराचे असते.
* वयोवृद्ध मधुमेही तब्येतीच्या बाबतीत अनभिज्ञ असतात.
* १२.९० टक्के मधुमेहाचे रुग्ण लठ्ठपणाचे शिकार असतात.
* मधुमेह, महिलांच्या मासिक चक्राला आणि यौन इच्छेला प्रभावित करतो.
* मधुमेहींची रक्तशर्करा सातत्याने अतिशय अचूकरीत्या मोजणे आणि त्यानुसार इन्सुलिनचा डोस प्रत्येकवेळी अगदी तंतोतंत वेळेत देणे होत नाही. ६० ते ७० टक्के मधुमेहींमध्ये वेळेत इन्सुलिन घेतले जात नाही.
* सीजीएमएस म्हणजेच कन्टिन्युअस ग्लोकोज मॉनिटरिंग सिस्टिम या उपकरणाद्वारे रक्तशर्करेवर अतिशय बारकाईने सतत लक्ष ठेवणे शक्य होते. त्यानुसार संबंधित व्यक्तीला इन्सुलिनचा डोस द्यावा लागतो.
* किडनी फेल होण्याच्या सर्वेक्षणामध्ये ४४ टक्के रुग्ण मधुमेहग्रस्त आढळतात.
* मधुमेह असेल तर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता वाढते.
* दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ टेलिव्हिजनसमोर बसल्यास डायबेटीस वाढतो.
* सध्या मधुमेहाचे रुग्ण इन्सुलिनचा वापरतात. नव्वद वर्षांपूर्वी मधुमेहाचे रुग्ण बोवाइन आणि पोर्सिने इन्सुलिन वापरत होते.
* धुम्रपान केल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.
* तीन महिने किंवा त्यापेक्षा मोठ्या बाळाला स्तनपान दिल्यास बाळाला लहानपणात टाइप-१ मधुमेहाचा धोका कमी होतो. आणि तरुणपणात लठ्ठपणाचा धोका राहत नाही.
* मधुमेह झाल्यानंतर पायातील हाडे कठीण होत कमकुवत होतात. त्वचा कोरडी होणे, केस गळणे अशा समस्या वाढतात.
* २०२५ पर्यंत संपूर्ण जगात ३३.३ कोटी लोक डायबेटीसचे रुग्ण असतील.
* उपवासामुळे शरीरातील रासायनिक क्रियेत बदल होतो. त्याचा मधुमेहावर दुष्परिणाम होतो म्हणून पूर्ण उपवास करण्याचे टाळावे.