आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपण पाहतो की, मुलीच्या लग्नानंतर तिच्यामध्ये अनेक बदल होतात. लग्नाआधी तरुणी स्वतःला स्लिम आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. पण लग्नानंतर महिलांच्या शरीराचा आकारच बदलतो. लग्नानंतर महिलांच्या वजन वाढण्याचे नेमके कारण काय असू शकते ? लग्नाआधी तरुणी स्वतःच्या शरीराला खुप जपतात. थोडे जरी वजन वाढले तरी त्या टेन्शनमध्ये येतात आणि वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. हेच जर लग्नानंतर झाले तर मात्र आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. वाढलेले वजन त्यांच्यासाठी समस्या बनलेले असते. लग्नानंतर वाढत्या वजनाचे कारण काय असू शकते ? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया….
१. लग्नानंतर मुलीच्या प्राथमिकता बदलतात. त्यांना त्यांच्या पती आणि घरातील सदस्यानुसार आपली दिनचर्या ठेवावी लागते. त्यामुळे त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांचे वजन वाढते.
२. लग्नानंतर तरुणीला आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या घरात अॅडजस्ट होणे तिच्यासाठी अवघड असते. यासाठी तिला बराच वेळ द्यावा लागतो. अशावेळी तरुणीला अनेक तणावाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे वजन वाढते.
३. लग्नानंतर अनेक गोष्टी बदलत असल्याने महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. त्यासोबतच महिला सेक्शुअल लाइफमध्येही अॅक्टिव्ह होतात. या कारणानेही वजन वाढू लागतं. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळेही वजन वाढू लागतं.
४. लग्नानंतर जास्तीत जास्त महिलांच्या झोपण्याच्या वेळेत बदल होतात. वेगवेगळी कामे उरकून त्यांना झोप घ्यावी लागते. अशावेळी त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. आणि पुरेशी झोप न मिळाल्यानेच त्यांचं वजन वाढू लागतं.
५. लग्नाआधी फिटनेसबाबत जागृत असणाऱ्या महिला लग्नानंतर मात्र, फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. त्यांना यासाठी पुरेसा वेळ मिळणे हे कारण असते. हेच दुर्लक्ष करणं त्याच्या वाढत्या वजनाचे कारण ठरते.
६. घरच्या कामामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष न देणे आणि शिळे अन्न खाणे यामुळे महिलांमध्ये लठ्ठपणा वाढतो. त्याचबरोबर बाहेरचे अन्न खाणे त्यामुळे शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनची कमतरतास होऊ लागते.
७. लग्नाआधी तरुणी बऱ्याच मोकळ्या वातावरणात असतात. त्यांचे लग्नानंतर सासरकडच्या अनेक जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबावामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे वजन वाढते.