आरोग्यनामा ऑनलाईन – लग्नांनतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी धडपणाऱ्या महिला मोठ्याप्रमाणात दिसतात. लग्नानंतर वजन वाढण्याची ही समस्या पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आहे. लग्नाआधी अतिशय स्लीम आणि फिट असणारी तरूणी लग्नानंतर मात्र जाडजूड दिसू लागते. असे का होते याची अनेक कारणे आहेत. याविषयी आपण जाणून घेऊ या.
लग्नानंतर वजन वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे महिलांमधील हर्मोन्समध्ये होणारे बदल होय. लग्नानंतर अनेक गोष्टीत बदल झाल्याने हार्मोन्समध्येही हा बदल होताना दिसतो. तसेच महिला सेक्शुअल लाइफमध्येही अॅक्टिव्ह झाल्याने त्यांचे वजन वाढू लागते. गर्भधारणा नको असल्याने काही महिला गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. या गर्भनिरोधक गोळ्यांमळेही वजन वाढते. तसेच लग्नाआधी तरूणी बऱ्यापैकी मोकळ्या वातावरणात असतात. आणि लग्नानंतर सासरी आल्यानंतर अचानक अनेकप्रकारच्या जबाबदाऱ्या, सामाजिक दबाव येतो. यातूनच आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि वजन वाढण्यास सुरूवात होते. गर्भधारणा झाल्यानंतरही महिलांचे वजन वाढते. अशा स्थितीत वजन वाढणे हे स्वाभाविक आहे. परंतु, अनेक महिला बाळाच्या जन्मानंत वजन कमी करण्याचे प्रयत्न करत नसल्याने अथवा तसा वेळच न मिळाल्याने वजन वाढते. याचवेळी शरीरात अनेक बदल होत असल्यानेही वजन वाढते. शिवाय, लग्नानंतर महिलांच्या झोपण्याच्या वेळेत बदल होतात. वेगवेगळी कामे उरकून त्यांना झोप घ्यावी लागते. पुरेशी झोप न मिळाल्याने त्यांचे वजन वाढते.
लग्नानंतर मुलींना स्वताची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. पती आणि घरातील सदस्यांना अनुकूल अशी दिनचर्या त्यांना ठेवावी लागते. तसेच आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी यावे लागते. अशा नवीन ठिकाणी स्वताला स्थिर करणे हे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर असते. याच तणावातून वजन वाढण्याची समस्या त्यांना भेडसावते. लग्न होऊन नवीन घरात आल्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती बदलतात. जेवणात बदल होतो. यामुळेही त्यांच्या वजनात वाढ होते. शिळे अन्न खाल्ल्यानेही महिलांमध्ये जाडेपणा वाढतो.