आरोग्यनामा ऑनलाईन- आजकाल तरुणांचे जीवन इतके धावपळीचे झाले आहे की, त्यांच्या आयुष्यात ते फक्त शिक्षण, करिअर, घर, कार आणि चांगल्या पगाराच्या नोकरीलाच प्राधान्य देतात. आयुष्याच्या या गरजा भागविण्यात तरुण इतके गुंतत जातात की, आयुष्यातील सर्वांत मौल्यवान वेळ निघून जातो आणि वय 40 वर्षांच्या पार निघून जाते. आजकाल प्रत्येक जोडप्याची गरज म्हणजे आर्थिक स्थिरता(Improve Fertility) ही झाली आहे. या सर्वांमध्ये वय वाढत जाते आणि आपण जेव्हा पालक होण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
पुरुष आणि स्त्रियांमध्ये मुलाला जन्माला(Improve Fertility) घालण्यासाठी 30 वर्षे सर्वांत योग्य काळ आहे. बऱ्याचदा स्त्रिया किंवा पुरुष शारीरिकदृष्ट्या निरोगी असूनही त्यांची प्रजनन क्षमता गर्भधारणेसाठी सपोर्ट करत नाही. डॉक्टर म्हणतात की, बहुतेक महिला 30 नंतर गर्भधारणेबद्दल विचार करतात. पुरुषही 33 नंतर मुलांचा विचार करतात. परंतु मानवी शरीर अशा प्रकारे बनलेले आहे की 30 वर्षांच्या आधीच मुलाला जन्म देण्यास अनुकूल काळ मानला गेला आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आम्ही काही अशा टिप्स येथे देत आहोत, ज्यामुळे महिलांना लवकर गर्भधारणा होण्यास मदत होईल-
बाळाची प्लॅनिंग 30 च्या आधी करा
जसजसे स्त्रियांचे वय वाढत जाते, तसतसे नैसर्गिकरित्या अंडाशयमध्ये अंड्यांची संख्या कमी होऊ लागते. याशिवाय त्यांची गुणवत्ताही कमी होऊ लागते. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते. संशोधनानुसार महिलांमध्ये 40 नंतर गर्भधारणेची शक्यता 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. वयाच्या 44 व्या वर्षी अंडाशयात अंडी तयार होण्याच्या क्षमतेत 1.6 टक्क्यांपर्यंत घट होते. यानंतर, गर्भपात होण्याची शक्यता 25 टक्क्यांपर्यंत वाढते. अंडाशयाव्यतिरिक्त ट्यूबमध्ये डॅमेज, एंडोमेट्रिओसिस, ओव्हुलेशनमध्ये कमी येऊ लागते. म्हणून ही हमी कोणीच देऊ शकत नाही की चाळीशीनंतर मुलाचा जन्म होईलच. म्हणूनच तिशीपूर्वीच बाळाचे प्लॅनिंग करणे अधिक चांगले असते, जेणेकरून दवाखान्याची पायरी चढण्याची गरज भासत नाही.
पुरुषांची क्षमतादेखील महत्त्वाची
मूल जन्माला घालण्यासाठी पुरुषांची क्षमतादेखील चांगली असणे आवश्यक आहे, परंतु अधिक वय झाल्यावर पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागते. संशोधनानुसार 5 पैकी एका पुरुषामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याची तक्रार असते. याव्यतिरिक्त, शुक्राणूंच्या इतर क्षमतांचादेखील परिणाम होतो. जसे की शुक्राणूंचा आकार चुकीचा होणे, शुक्राणू लवकर मूव्ह न करणे इ. यासोबतच जर अंडकोष खराब झाले तर अधिक समस्या निर्माण होतात. रोग, औषधांची सवय, मादक पदार्थांचे व्यसन, हार्मोन्स आणि अनुवंशिक परिणामदेखील परिणाम करतात.
पाच टेस्ट करणे आवश्यक आहे
बाळाची प्लॅनिंग करण्यापूर्वी सर्वप्रथम हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, आपली प्रजनन क्षमता कशी आहे. यास आपण जितक्या लवकर जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तितके गर्भधारणेसाठी चांगले होईल. यासाठी, पाच टेस्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
– एएमएच ब्लड टेस्ट
– अल्ट्रासाउंड
– एन्ट्रल फॉलिकल काउंट
– वीर्य अॅनालिसिस
– मेडिकल अँड रिप्रॉडक्टिव्ह हिस्ट्री
या पाच चाचण्यांविषयी पूर्णपणे माहिती झाल्यानंतरच आपले डॉक्टर निर्णय घेऊ शकतील की, आपल्याला कशा पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी विचार करायला हवा किंवा एखादी समस्या असल्यास त्यावर उपचार कसा करायला हवा.
जीवनशैली आदर्श बनवा
गर्भधारणेसाठी जीवनशैली आदर्श बनवणे सर्वांत महत्त्वाचे आहे. कसे ते जाणून घेऊया…
– महिलांनी धूम्रपान, अल्कोहोलपासून दूर राहावे.
– कठोर शारीरिक हालचालींपासून दूर राहा.
– जंक फूड जास्त साखर आपल्यासाठी हानिकारक असू शकते.
– जास्त वजन किंवा कमी वजन हे दोन्ही महिलांसाठी घातक ठरू शकते.
– पुरुषांचे जास्त वजनदेखील त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी करतात.
– जर आपण 40 नंतर गर्भधारणा करण्याचा विचार करत असाल, तर एग फ्रीजिंग करणे चांगले राहील. जर आपण जास्त वयात फ्रीज कराल तर समस्या उद्भवू शकते. म्हणून, 35 च्या आसपास एग फ्रीज करा.
– जर आयव्हीएफदेखील करायचे असेल तर ते याच वेळी करावे.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.