आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विवाहित महिला पायांच्या बोटांमध्ये चांदीची जोडवी घालतात. परंपरा, प्रथा म्हणून जोडीवी घातली जात असली तरी त्यामागे काही आरोग्यविषयक कारणे असतात. अनेकांना याबाबत माहित नसते. जोडवे हे पायाच्या मधल्या अथवा अंगठ्याच्या बाजूच्या बोटांमध्ये घातले जाते. जास्तीत जास्त महिला पायाच्या एकाबोटातच जोडवे घालतात. चांदीचे जोडवे घातल्याने महिलांना आरोग्याचे कोणते फायदे होतात, याबाबत जाणून घेवूयात.
हे होतात फायदे
१) जोडवे हे अॅक्युप्रेशरचे काम करतात. यामुळे तळव्यापासून नाभीपर्यंतच्या सर्व नसांना फायदा होतो.
२) पायाच्या बोटांचा संबंध पोट आणि गर्भाशयाशी असतो. जोडवे धारण केल्याने या नसांवर दबाव पडतो. यामुळे पोट आणि गर्भाशय निरोगी राहते. जोडवी महिलांची प्रजनन क्षमता वाढवतात.
३) महिला चांदीचे जोडवे घालतात. कारण चांदी ही चंद्राशी संबंधीत असते. चंद्र हा मनाचा कारक आहे. हे धारण केल्याने मानसिक शांतता लाभते.