आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य भेटे, असे म्हटले जाते ते खरेही आहे. सूर्य ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सूर्योदय झाल्यानंतर उठल्यास सुस्ती वाढते. यामुळे उत्साह जाणवत नाही. चपळाई कमी होते. सूर्योदयापूर्व उठणे खूप गरजेचे असून त्यामुळे ऊर्जा, उत्साह आणि गतिमानतेची अनुभूती येते. आरोग्य हे आपोआप प्राप्त होत नाही. त्यासाठी काही मेहनत घ्यावी लागते. शरीराला काही चांगल्या सवयी लावाव्या लागतात. याकडे दुर्लक्ष केल्याने हजारो लोक आपले मौल्यवान जीवन लवकर गमावतात.
आयुष्य सुंदर करण्यासाठी अरोग्यदायी जीवन जगण्यासाठी अशा सवयींसह व्यायाम खूप महत्वाचा आहे. दिवसाचे २४ तास असतात. त्यापैकी तब्बल २३ तास स्वत:साठी ठेवा. आणि अवघा १ तास तरी शरीरासाठी राखीव ठेवा. नेहमी सूर्योदयापूर्वी उठावे. पहाटेच्या वेळी बाहेर प्रदूषणमुक्त ताजी हवा असते. व्यायाम करण्यासाठी ही वेळ अतिशय चांगली असते. व्यायामाला कोणताही पर्याय नाही. यामुळे व्यायाम हा केलाच पाहिजे. निरोगी राहण्यासाठी तो आवश्यक आहे. शरीर तुमची काळजी घेण्यासाठी आहे. मग, तुम्हीसुद्धा शरीराची काळजी घेतली पाहिजे.
शरीर म्हणजे ईश्वराने दिलेली अनमोल भेट असून त्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारीही असते. आयुष्यभर आपले शरीर म्हणजे आपला पत्ता असतो. यासाठीच एक तास व्यायामासाठी शरीराला द्यावा आणि बाकीचे २३ तास शरीर तुमची देखभाल करेल.
थोडे-थोडे खाण्याने चांगली राहते पचनक्रिया, दिवसभर मिळते ऊर्जा
योगासने सुरू करताय ? मग या सूचनांचे आवश्य पालन करा