आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होते. त्यामुळे विविध साथीचे व विविध संसर्गजन्य रोग पसरतात. साचलेलं पाणी, अस्वच्छता आणि गर्दीची ठिकाणं यामुळे हे आजार अधिक पसरतात. या साथीच्या रोगांचा आपल्या शरीरावर हल्ला होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. साथीचे आजार व त्यापासून प्रतिबंध कसा करायचा याविषयी जाणून घ्या
कावीळ –
कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न, वैयक्तिक अस्वच्छता अशा विविध कारणांमुळे होतो.
गॅस्ट्रो
दूषित पाण्यामुळे उलटी व जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन शरीर कोरडे पडू शकते.
डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया
साचलेल्या पण्यातून डासांची उत्पत्ती होते. त्यातून अनेक डासांची निर्मिती होते. डास चावल्याने त्यामुळे थंडी वाजून येणं, ताप येणं, अंग दुखणं आणि काही वेळा शरीरातील रक्तातील रक्तपेशी कमी होऊन रक्तदाब कमी-जास्त होणं अशी लक्षणं दिसून येतात.
साथीच्या व संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी खालील काळजी घ्या –
पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. पाणी उकळून प्यावे.
घरी तयार केलेले ताजे पदार्थच खावेत. उघड्यावरील, माशा बसलेले पदार्थ टाळावेत.
रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ- कापलेली फळे, शीतपेय, पाणीपुरी, भेळ यांसारखे पदार्थ खाणे टाळा.
फळे व भाज्या खाण्याआधी धुवून घ्याव्यात.