आरोग्यनामा ऑनलाईन टीम – त्वचेच्या सुंदरतेची आपण अनेक उपाय करत असतो. पण तुम्ही आंघोळीच्या आधी या मालिशचा प्रयोग केल्यास तुम्हची त्वचा नेहमी चमकती, तजेलदार आणि मुलायम दिसायला लागेल. चला जाणून घेऊ अशा मालिश बद्दल
१. व्हिटॅमिन ई ऑयील, ग्लिसरीन आणि व्हॅसलिन एका बाउल मध्ये एकत्रित करून आंघोळीच्या आधी या मिश्रणाने मालिश करा. जर संपूर्ण शरीराला मालिश करणे शक्य नसल्यास फक्त हात, पाय, मान आणि चेहरा या भागावर मालिश करा. मालिश केल्यानंतर १५-२० मिनिटांनी आंघोळ करा. यामुळे त्वचा मुलायम होते आणि मॉइश्चराइज साठी दुसऱ्या कोणत्याही ऑयील किंवा क्रिम ची गरज भासणार नाही.
२. खोबरे तेल आणि लिंबाचा रस एकत्रित करून आंघोळीच्या १० मिनिटा आधी हलक्या हातांनी मालिश करा. या मालिश मुळे शरीरावरील टॅनिंग दूर होते. या मिश्रणामुळे त्वचा तजेलदार आणि टॅनिंग फ्री राहते.
३. एका बाउल मध्ये लिंबूचा रस, द्राक्षेचा रस, सफरचंदाचा रस आणि उसाचा रस सम प्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा. आता या मिश्रणाने शरीरावर ५ मिनिटापर्यंत मालिश करा आणि त्या नंतर आंघोळ करा. या मिश्रणाला चेहऱ्यावर लावताना कापसाने लावा याचा अधिक फायदा होईल. यामुळे तुम्हच्या त्वचेच्या रंगात बदल होईल आणि त्वचा कोमल दिसायला लागेल.
४.एका बाउल मध्ये लिंबूचा रस, ओट्स, दूध आणि गुलाबजल सम प्रमाणात घेऊन मिश्रण तयार करून घ्या. आत या मिश्रणाने शरीरावर हलक्या हाताने मालिश करा. या मालिश मुळे शरीरावरील मृत त्वचा दूर होण्यास मदत होते.