पाणी हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. तुमही दिवसभरात जितके पाणी प्याल तेवढे चांगले आहे. पण दिवसभरात किमान ८ ग्लास पाणी प्यावे असे सांगितले जाते. पण तुम्ही ज्या पद्धतीने पाणी पिताय ती पद्धत योग्य आहे का याची देखील खात्री करा. आयुर्वेदात पाणी पिण्याच्या काही पद्धती सांगितल्यात.
**पाणी पिण्यासाठी योग्य वेळ पाणी पद्धती**
— सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या
— रात्री ७ ते ८ तासांची झोप घेतल्यानंतर सकाळी शरीराला हायड्रेट करणं गरजेचं आहे. त्यासाठी सकाळी उठल्यानंतर सुरुवातीलाच एक ग्लास पाणी प्यावं.
–थंड पाण्याऐवजी गरम पाणी प्यावं
–सकाळी पाणी पिताना थंड पाणी पिणं टाळा. त्याऐवजी कोमट पाणी प्या. फक्त सकाळीच नव्हे, तर इतर वेळीही गरम पाणी पिणं फायदेशीर आहे. थंड पाण्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतात.
–जेवताना अति पाणी पिऊ नका.
–पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी जेवताना अति पाणी पिणं टाळा. पाण्याचे काही घोट घेणं ठिक आहे. मात्र पोट भरेल असं पाणी पिऊ नका. जेवणाच्या ३० मिनिटं आधी किंवा जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्या.
**व्यायाम करतानाही पाण्याचं महत्त्वं**
–व्यायाम करताना अधिक प्रमाणात घाम येतो. त्यामुळे व्यायामाच्या १५ ते ३० मिनिटं आधी एक ग्लास पाणी प्या. तर व्यायामा करतानाही मध्ये मध्ये पाण्याचे काही घोट घ्या. तसंच व्यायाम झाल्यानंतरही पुरेसं पाणी प्या.
लिंबू रस टाकून पाणी प्या
–पाण्यात लिंबाचा रस एकत्र करून प्यायल्यानं शरीरामार्फत परिणामकारकरित्या शोषलं जातं. लिंबाव्यतिरिक्त तुम्ही आल्याचा रसही टाकून पाणी पिऊ शकता.