आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात रक्त विविध प्रकारचे महत्वाचे कार्य करत असते. अनेकदा अनावश्यक व घातक पदार्थ खाल्ल्याने रक्तात काही हानीकारक तत्व पोहचतात. यामुळे शरीराचे नुकसान होते. यास रक्त अशुद्ध होणे म्हणतात. यामुळे पिंपल्स येणे, त्वचारोग, थकवा अशा समस्या होतात. वजन कमी होणे, पोटांचे विकार आदी, समस्या सुद्धा होतात. यासाठी रक्त शुद्ध असणे गरजेचे आहे. रक्तशुद्धीसाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेवूयात.
सफरचंद
यातील पेक्टिन नामक फायबर शरीरातील साखरेचे प्रमाण, रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवते. न्याहारीमध्ये त्याचा वापर करावा.
मासे
सालमन, टुना या माश्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असल्याने रक्तातील ट्रायग्लिसराईडची लेव्हल कमी होते. आणि रक्ताभिसरणावरील दाब कमी होतो.
कॉफी
कॉफी पिल्याने शरीराला सिरोसिसचाचा धोका नसतो. कॉफी लिव्हरला कॅन्सरपासून वाचवते.
लसूण
लासणातील अँटी इन्फ्लॅमरेटरी प्रॉपर्टीमुळे कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढत नाही. शरीरातील रक्ताभिसरण क्रिया नियंत्रित राहते.
द्राक्ष
द्राक्षात जास्त प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. ते शरीरातील इंफ्लेमेशन नियंत्रित ठेवतात. ते खाण्याने लिव्हरला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.
पाणी
किडनीच्या आरोग्यसाठी भरपूर पाणी प्या. किडनी पाण्याच्या साहाय्याने आपल्या शरीरास उपयुक्त नसलेले पदार्थ साफ करीत असते. पाण्याने रक्तपेशी देखील खुल्या होतात. रक्ताभिसरण प्रक्रियेला वेग येतो.
ब्लूबेरी
ब्लूबेरी खाल्ल्याने लिव्हर चांगले राहते. लिव्हर साठी हे खूप फायदेशीर आहे.