आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : हिवाळ्यात गरम पाण्याने(Hot Bath) आंघोळ करणे सर्वांनाच आवडते. साधारणपणे बहुतांश लोक गरम पाण्याने आंघोळ(Hot Bath) करतात, परंतु अनेक शोध सांगतात की, जर गरम पाण्याचे तापमान 32 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्यामुळे प्रकृती बिघडू शकते. आंघोळीसाठी 32 डिग्री सेल्सियसपर्यंत गरम पाणी उपयुक्त आहे. यापेक्षा जास्त गरम पाण्याने त्वचा आणि केसांचे नुकसान होते.
यामुळे कोणत्या प्रकारचे नुकसान होते ते जाणून घेवूयात…
1 डॉक्टरांनुसार 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हॉट वॉटर बाथ घेतल्याने मनुष्याच्या फर्टिलिटी संबंधी समस्या वाढतात.
2 गरम पाण्याने आंघोळ केल्याने शारीरात उर्जेचा स्तर कमी होतो. बॉडीला रिफ्रेश करून तिला एनर्जी देण्याऐवजी आळशी बनवते.
3 गरम पाण्याने त्वचा लाल होते आणि रॅशेस किंवा अॅलजी होऊ शकते. ड्रायनेस आणि खाजेचा प्रॉब्लेम होऊ शकतो.
4 त्वचेच्या टिशूजचे नुकसान होऊ शकते आणि त्या डॅमेज होऊ शकतात.
5 त्वचेबर लवकर सुरकुत्या पडू लागतात.
6 केंसांवर वाईट परिणाम होतो. मॉयश्चर कमी होतो, केस रफ अणि ड्राय होतात. स्कॅल्प ड्राय होते. डँड्रफ वाढू शकते. केस कोरडे पडून गळू लागतात.
7 डोळ्यांचा ओलावा कमी होऊ शकतो. यामुळे खाज, लालसरपणा, पाणी येणे, अशा समस्या होतात.
8 हात आणि पायाच्या नखांवर वाईट परिणाम होतो. नखे तुटू लागतात, इंफेक्शन आणि जवळपासची त्वचा फाटण्याची समस्या होते.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.