आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे वयस्कर लोकांना होणारे काही आजार तरूणांनाही होऊ लागले आहेत. ही गंभीर बाब असून यासाठी तरूणांनी आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, योग्य आहार, ताणतणाव कमी करणे हे जरूरी आहे. तसेच कोणत्याही आजारावर उपचार करताना योग्य उपचार पद्धती अवलंबणे गरजेचे आहे. आयुर्वेदासह होमिओपॅथीसुद्धा तरूणांसाठी एक चांगली उपचारपद्धती ठरू शकते.
या पद्धतीचे महत्व
१. किशोरावस्था तसेच तरुणाईच्या व्याधींमध्ये होमिओपॅथी उपचाराने आजार कमी वेळात सोप्या पद्धतीने समुळ नष्ट होतात. मन व शरीर निरोगी बनते.
२. या उपचार पद्धतीत लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेण्यास फार सोपे आहे. शिवाय चेतना शक्तीला उत्तेजना दिली जाते.
३. सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसारख्या आजारांवर होमिओपॅथी प्रभावशाली ठरतेय.
४. होमिओपॅथी उपचार पद्धतीने तरूणांच्या मनाची लक्षणे व शारीरिक लक्षणे याची सांगड घालून आजार पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो.
५. यात औषध निवडताना रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे, विचार, सवयी, आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना व त्यांचा मनावरील परिणाम, अशी बरीच लक्षणे विचारात घेतली जातात.
६. रूग्ण खूप लवकर, कमी वेळेबरा होतो. थंडी, ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच वेळात आजार संपूर्णपणे घालवता येतो.
७. यात गंभीर आजारास थोडा वेळ लागतो. होमिओपॅथीने आज टॉन्सिलायटीस, अॅपेंडीसायटीस, किडनी स्टोन, मुळव्याध, भगंदर, गर्भाशयाच्या गाठी यासारखे अनेक शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार शस्त्रकिया न करता बरे केले जातात.