आरोग्यनामा ऑनलाईन टीम – घरातील वडीलधारी मंडळीच नव्हे, तर डॉक्टर सुद्धा पालेभाज्या आणि फळभाज्या नियमित खाण्याचा सल्ला देतात. भाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. एवढेच आपल्याला सांगितले जाते. पंरतु, या भाज्या कोणत्या रोगांवर गुणकारी असतात, तसेच त्यांच्यामध्ये कोणते औषधी गुणधर्म असतात, या विषयी आपल्याला सहसा समजत नाही. याचविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत.
पत्ताकोबी
यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, जिवनसत्व (ए.बी.सी.) बरोबरच लोहाचे प्रमाण असते. तसेच जिवनसत्व सी मुळे पचनसंस्था सुरळीत राहते. यातील अमीनो अॅसीडमुळे जखम लवकर भरते. केस गळत असतील तर पत्ताकोबीचे पान सेवन करावे. केस गळती थांबते.
दोडका
कावीळीत नाकामध्ये दोडक्याच्या रसाचे थेंब टाकल्यास नाकामधून पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर येतो. यामुळे कावीळ बरी होते. दोडक्याची पाने आणि बिया वाटून त्वचेवर लावल्यास गजकर्ण, खाज, यासारखे आजार तात्काळ बरे होतात. डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी दोडका लाभदायक आहे.
पालक
पालकामध्ये ए.बी. सी. आणि ई या जिवनसत्व, प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, थायमिन, फायबर ही पोषक तत्व असतात. दम्याच्या रुग्णांनी पालकाचे सेवन केल्यास आराम मिळतो. जिवनसत्व ए आणि सी असल्यामुळे त्वचेचे आजार होत नाही. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामूळे दात मजबूत होतात.
भोपळा
यामध्ये कार्बोहायडेट असल्यामुळे अन्नपच होते. डोके दूखत असेल तर भोपळ्याची भाजी करून खाल्ल्याने डोकेदुखी थांबते. भोपळ्याच्या बिया वाटून खाल्ल्याने शरिरातील उष्णता कमी होते व तोंड येण्याची समस्या दूर होते.
गाजर
यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॉस्परस, स्टार्च आणि कॅल्शिअम तसेच कॅरोटीन असते. लहान मुलांना दात येतांना गाजराचा रस पाजल्यास त्रास होत नाही. दुध पचण्यास मदत होते. अन्न पचत नसेल तर दररोज दोन गाजर नियमित खावेत. गॅसमुळे पोटाचा त्रास होत असेल तर रोज गाजर उकळून ते पाणी प्यावे. उचकी लागत असेल तर गाजराच्या रसाचे चार-पाच थेंब नाकामध्ये टाकावेत.