आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात आरोग्यसेवेसाठी नैसर्गिक उपचारपद्धती किंवा नैसर्गिक औषधांचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो. काही आदिवासी लोक आजही जैवविविधतेवर आवलंबून आहेत. मध्यप्रदेश आणि गुजरात मधील काही आदिवासी लोक जैवविविधतेमधून औषध निर्मिती करून रोगांवर उपचार करतात. हे आदिवासी लिंबू, ईडलिंबू, संत्री यांच्या आंबट रसाचा वापर करून अनेक रोगांवर उपचार करतात. या आंबट रसाद्वारे मुळव्याधीसह अनेक रोग बरे केले जातात.
या रोगांवर गुणकारी
* सावलीत वाळवलेल्या संत्र्याची साल बारीक कुटून शुद्ध तुपासोबत समान मात्रेमध्ये मिसळून घ्यावी. हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस १-१ चमचा घेतल्यास मुळव्याध बरा होतो.
* किडनीच्या आजारामध्ये आराम मिळण्यासाठी ईडलिंबूचा रस आणि एक कप लिंबाच्या रसामध्ये १ ग्रॅम काळे मीठ टाकून प्यावे.
* काळे मिरे (५) अद्रक २ ग्रॅम, लिंबाचा रस (२ मिली) आणि चिमुटभर काळे मीठ एकत्र करावे. कावीळ झालेल्या रुग्णाला दररोज हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस दिल्यास आराम मिळतो.
* संत्र्यांच्या रसामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात. हृदयरोगांची शक्यता कमी होते. दररोज ५०० मिली संत्र्याचा रस सेवन केल्यास शरीराला २९२ मिली ग्रॅम हेस्पेरीडीन मिळते. हा रस उच्च रक्तदाब नियंत्रित करतो.
* संत्र्याच्या रसामुळे किडनी स्टोन्स तयार होत नाहीत. संत्री क जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. क जीवनसत्त्व आंबट फळांमध्येच भरपूरआढळते.
* एक चिमुटभर हळद, एक चमचा दुधाची साय अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये मिसळून शरीरावरील फोड, काळे डाग यावर लावल्यास चांगला फरक दिसून येतो.
* निर्गुंडीची वाळलेली पाने (१५) आणि ईडलिंबूचा रस (५ मिली) एकजीव करून घ्यावा. मिरगीचा त्रास त्रासणाऱ्या रूग्णाच्या नाकामध्ये या मिश्रणाचे ३-४ थेंब दिवसातून ३ ते ४ वेळेस टाकावे. तीन ते चार महिने हा उपाय केल्यास वारंवार मिरगी येण्याचे प्रमाण कमी होते.