आरोग्यनामा ऑनलाइन टीम : विस्मरण ही सर्वात वाईट सवय आहे. या सवयीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. ही समस्या जवळपास प्रत्येक वयोगटात आढळून येते. एकाग्रतेची कमतरता हे विस्मरणाचे प्रमुख कारण आहे. स्मरणशक्तीसाठी पोषक तत्वांची गरज असते. पोषक तत्त्व शरीरात कमी असल्यास ही समस्या जाणवते. या पोषक तत्वांची पूर्तता कशी करावी, याविषयीची माहिती घेवूयात.
स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय
१) ९ बदाम रात्री पाण्यात भिजवावेत. सकाळी साल काढून बारीक पेस्ट तयार करावी. ही पेस्ट एक ग्लास गरम दूधात टाकून हलवून घ्यावी. यामध्ये ३ चमचे मधसुध्दा टाकता येते. हे दूध प्यायल्यास दोन तास काहीच खाऊ नये.
२) सकाळी कॉफी प्यायल्यास दिवसभर फ्रेश वाटते. मेंदू तल्लख राहतो.
३) मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ब्रम्हीचा एक चमचा रस रोज प्यायल्यास फायदा होतो. पाने चावून खाल्यानेसुध्दा स्मरणशक्ती वाढते.
४) रोझमेरीच्या वनस्पतीच्या तेलाने स्मरणशक्ती वाढते. यामध्ये अनेक औषधी गुण असतात.
५) सफरचंदातील पेक्टिन फायबर हा इम्यून सपोर्टिव्ह प्रोटीन्सची पातळी वाढवते. रोज सफरचंदाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.
६) जवसाच्या तेलामध्ये ओमेगा ३ फॅक्ट अॅसिड समान प्रमाणात असते. जवसाचे तेल एकाग्रता वाढवते. स्मरणशक्ती वाढवते.
७) अक्रोडमध्ये अँटीऑक्सीडेंट असतात. दिवसातून कमीत-कमी सात अक्रोड खाल्ल्यास आजारपण दूर राहते. सोबत, लाठ्ठपणासुध्दा नियंत्रीत होतो. अक्रोड स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. २० ग्रॅम अक्रोड आणि १० ग्रॅम खिसमस मिळून खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.
८) दालचिनीचे तेलसुध्दा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लाभदायक आहे. यामुळे मेंदू गतीने काम करतो. हे तेल डोक्याला थंड ठेवते. तणाव दूर करण्यास मदत होते.
९) मासे मेंदूसाठी सर्वात लाभदायक आहेत. यामध्ये ओमेगा ३ फॅक्ट अॅसिड्स असते. जे मेंदूसाठी अवश्यक असते. मासे खाल्ल्यास बुध्दी तल्लख होते आणि स्मरणशक्ती वाढते.