आरोग्यनामा ऑनलाइन टीम – त्वचा कोरडी झाल्यास रॅशेज, खाज येणे आणि चेहऱ्याची चमक कमी होणे, अशा समस्या होतात. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते योग्य प्रकारे केल्यास कोरड्या त्वचेची समस्या ताबडतोब नियंत्रणात येऊ शकते. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी एक बेस्ट उपाय असून त्याची आपण माहिती घेणार आहोत. तसेच सौंदर्यवृद्धीसाठी आणखीही काही उपाय जाणून घेवूयात.
हा उपाय करा
१ आठ ते दहा बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा
२ भिजवलेल्या बदामांची सकाळी पेस्ट बनवून घ्या
३ या पेस्टमध्ये दोन ते तीन चमचे दूध मिक्स करा
४ ही पेस्ट एका बाटलीत ठेवून द्या
५ ही पेस्ट रोज सकाळ संध्याकाळ त्वचेवर लावा
६ त्वचेचा शुष्कपणा दूर होईल
आणखी काही उपाय
१ अर्धा कप गार दुधात ऑलिव्ह आईलचे काही थेंब टाका. हे कॉटनने लावा. चेहरा तजेलदार होईल.
२ एक चमचा तिळाच्या तेलात थोडी दुधाची साय मिक्स करा. शुष्क त्वचेवर या मिश्रणाने वीस मिनिटे मसाज करा.
३ गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी असते. कॅल्शियम आणि पॅक्टिन फायबरही असते. एक ग्लास गाजर ज्यूस नियमित प्यायल्याने त्वचेचा शुष्कपणा दूर होतो.
४ पपईमध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई आणि अँटिऑक्सिडेंट असतात. हे त्वचेला निरोगी ठेवतात. पपईचा ज्यूस नियमित प्यायल्यास त्वचेचा शुष्कपणा दूर होतो.
५ सोयबिनमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. सोयाबिन ज्यूस नियममित प्यायल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात.