आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतात मलेरियाने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात मलेरियासारख्या आजाराची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावते. कारण पावसाळ्यात मलेरियाच्या डासांची उत्पत्ती जास्त होते. जाणून घ्या मलेरियाचा इतिहास, त्याची कारणे –
मलेरियाचा इतिहास-
२५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन असतो.
इटालियन शब्द मलेरिया (Mala-दूषित, aria-हवा) म्हणजेच Mal’aria या शब्दापासून Malaria असा शब्द तयार झाला.
क्रिस्टोफर कोलंबस आपल्या आफ्रिकन गुलामांसह अमेरिकेत मलेरिया घेऊन आले आणि त्याचा तेथे झपाट्याने प्रसार झाला.
पुढील तीन शतके जसजसा व्यापार व देशादेशांमधील युद्ध वाढत गेली तसतसा मलेरियाचा प्रसार जगभर झाला.
इ. स. १७४० मध्ये या विशिष्ट ज्वराला मलेरिया हे नाव इंग्लिश लेखक होरेस वाम्पोत्र यांनी दिले. इ.स. १७४३ मध्ये जॅक्वीयर व इ.स. १७५० मध्ये टॉर्टी यांच्या ग्रंथात मलेरिया या संज्ञेचा उल्लेख आहे.
कसा होतो मलेरिया ?
मलेरिया हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो ‘अॅनाफिलीस’ जातीचा डास चावल्याने होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवितात. त्यानंतर तांबड्या रक्त पेशींमध्ये ते स्वतःहून मिसळतात. मलेरियाचा प्रादुर्भाव होतो.
मलेरियाची लक्षणे –
ताप हे मलेरियाचे प्रमुख लक्षणं आहे.
थंडी वाजून ताप येणे
थंडी-तापासोबत जर तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो.
ताप उतरल्यानंतर घाम सुटणे
ब्लड शुगरचे प्रमाण कमी होणे
पोटाच्या समस्या आणि उलट्या होणे
शुद्धीत नसणे, रक्त कमी होणे, अॅनीमिया, मसल्स पेन.