आरोग्यानामा ऑनलाइन टीम : बदललेल्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्ये उच्च रक्तदाबासारखी जीवघेणी समस्या वाढत चालल्याचे दिसून येत आहे. सतत ताणतणाव, कामाचे जास्त तास, बैठे काम, व्यसनांचे वाढते प्रमाण, अवेळी खाणे, अशा विविध कारणांमुळे ही समस्या वाढत चालली आहे.
ही आहेत कारणे
१ संगणकासमोर तासन्तास बसून काम करणे.
२ शरीराची हालचाल मंदावलेली असणे, व्यायामाच्या अभाव.
३ दारू व तंबाखूचे व्यसन.
४ नोकरी मिळविण्याठी, टिकविण्यासाठी असलेली स्पर्धा.
हे आहेत परिणाम
हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावर परिणामाचा संभव असतो.
सतत बैठे काम यामुळे निद्रानाश, वारंवार छातीत दुखणे, पॅनिक होणे, ताणतणाव वाढणे.
हृदयविकार, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, पक्षाघाताचा झटका येणे, असे धोके यामुळे संभवतात.
हे लक्षात ठेवा
१ चांगला आहार, विहार, विचार या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे.
२ सोशल मीडियाचा वापर कमी करावा.
Visit : arogyanama.com