आरोग्यनामा ऑनलाइन टीम : सर्वात जास्त हार्ट अटॅक हे सकाळी पाच ते सात या काळात येतात,असे जर्नल हार्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्पेनच्या नॅशनल सेंटर फॉर कार्डियोवॅस्कुलर संशोधनात नमूद करण्यात आले आहे. सकाळी लवकर येणारे हार्ट अटॅक खूप जास्त घातक असतात. ज्या लोकांना हृदयासंबंधी तक्रारी असणारे, चुकीची जिवनशैली असणारे यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अशा लोकांनी काळजी घेणे गरजेचे असते.
सकाळी लवकर हार्ट अटॅक येण्याची काही कारणे आहेत. सकाळच्या वेळी शरीरामध्ये कार्टिसोल नामक हार्मोनची पातळी सर्वात जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच या काळात हृदयाचे विद्यूत प्रणाली कमजोर असते. यामुळे हृदयामध्ये रक्तप्रवाह कमी होतो. हृदयाच्या पेशी खराब होऊ शकतात. सकाळी रक्ताच्या नलिका जास्त जाड आणि कडक होतात. यामुळे ब्लड क्लॉटिंग होऊ शकते आणि हार्ट अटॅकच्या संधी वाढतात. यामुळे रक्त खूप घट्ट होते आणि रक्तामधील प्लेटलेट्स जास्त चिकट होतात. यामुळे ब्लड क्लॉटिंगचे चान्स जास्त असतात. रक्तात केएलएफ१५ नामक द्रव्य प्रवाही असते. ते प्रोटीनची पातळी कमी करते. यामुळे ब्लड क्लॉटिंग आणि हार्ट अटॅकचे चान्स वाढतात.
सकाळचा घातक हार्ट अटॅक टाळण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी एक ग्लास पाणी अवश्य प्यावे. यामुळे रक्तामधील थिकनेस आणि चिकटपणा कमी होईल. हृदयाच्या तक्रारी असतील तर सकाळी अचानक उठणे, व्यायाम करणे किंवा शारीरीक कष्ट करणे टाळावे. रात्री बाथरुमसाठी उठताना झटक्याने उठू नये. उठताना शरीर थोडे हलवा, ताणा. नंतर हळुहळू उठावे. २४ तासांत एकदा हार्ट किंवा रक्तदाबाची गोळी घ्यायची असेल तर सकाळी किंवा दुपारी घेण्याऐवजी रात्री झोपण्यापुर्वी घ्यावी. कमी मीठ, कमी साखरेचा चौरस आहार घ्यावा. नियमित रक्तदाब आणि कोलेस्टोरॉलची तपासणी करावी.