आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जगभरात बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहेत. भारतात ही स्थिती जास्त गंभीर असून येथे ३० ते ३५ वर्षांच्या लोकांनाही हार्ट अॅटॅक येतो. भारतात हार्ट अॅटॅक येण्याचे वय दहा वर्षांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे. कमी वयात हा हार्ट अटॅक येण्याची कारणे, आणि तो टाळण्यासाठी सोपे उपाय आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत कारणे –
१) पोटावर अतिरिक्त चरबी तयार होणे
२) धूम्रपान करणे
३) उच्च रक्तदाब आणि मधुमेह
४) फळे आणि हिरव्या पालेभाज्या कमी खाणे
५) व्यायामाचा अभाव
६) फास्ट फूड
७) मानसिक ताणतणाव
बचावाचे सोपे उपाय
* वयाच्या तिशीनंतर आरोग्य तपासणी करा.
* जंक फूड टाळा.
* रोज ३० मिनिटे व्यायाम करा.
* बाहेरचे तळलेले खाणे टाळा.
* धूम्रपान आणि दारू टाळा.