आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लठ्ठपणा हा एक आजार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम केला जातो. परंतु, आहाराकडे आपण हवे तेवढे लक्ष देत नाही. डिटॉक्स डाएट, व्हेजिटेरियन डाएट, लो-फॅट डाएट वजन कमी करण्यासाठी केले जाते. त्यापासून फायदे किती होतात, हे निश्चित सांगता येत नाही. कोणत्या आहाराचा नेमका परिणाम काय होतो ते माहीत असणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी उपयोगी काही आहाराबाबतची माहिती घेवूयात.
हे आहेत डाएटचे प्रकार
एका आठवड्यात साडेचार किलो वजन कमी करायचे असेल तर हे डाएट करता येऊ शकते. एका आठवड्यात फक्त कोबीचे सूपच आहारात घ्यावे. हे सूप शक्य होईल तितके सूप सेवन करावे. इतर खाद्यपदार्थ खावू नयेत. यामुळे कमी वेळेत जास्त वजन घटते. मात्र हा तेवढासा संतुलित आहार नाही. यामध्ये पोषणतत्त्वे नाहीत. हा डाएट केल्यास दिवसभर वेळोवेळी भूक लागत राहते. एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस हा डाएट पाळला तर शरीरामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्सची कमतरता भासू लागते. त्यामुळे तज्ज्ञांना विचारूनच हे डाएट करावे.
काय परिणाम होतो
यामध्ये फॅट व कॅलरीज कमी असल्याने कमी कालावधीत जास्त वजन घटते. हा आहार चालू राहतो तोपर्यंत वजन घटत राहते. तो बंद करून नेहमीचे जेवण घेणे सुरू केल्यानंतर वजन परत वाढू लागते.
डिटोक्स डाएट
यामध्ये सर्व प्रकारचे वाईट अन्नपदार्थ दूर केले जातात. याद्वारे शरीरातील केमिकल्स व टॉक्सिस बाहेर जाते. यामध्ये डोकेदुखी व ब्लोटिंगसारख्या समस्याही निर्माण होतात. यामध्ये जास्तीत जास्त पाणी प्यावे. ताजी फळे व भाज्या खाव्यात. मात्र, चॉकलेट, अल्कोहोल, साठवलेले फूड, तळलेले पदार्थ खाऊ नये. हा प्रकार अवलंबल्यास ताजेतवाने वाटते. शरीरातील केमिकल काढणारी डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रियाही पूर्ण होते.
काही वेळेस वजनातही चांगली घट येते. या प्रकारात सर्वात मोठा धोका म्हणजे सर्व पोषणतत्त्वांचे संतुलन होत नाही. जेवण न शकल्यास व्यक्तीची स्थिती उपवास असल्यानंतर जशी होते तशी होत असते. सुरुवातीच्या काही आठवड्यामध्ये चांगले वाटत असल्याचा अनुभव येतो.
काय परिणाम होतो
कॅलरीजचे प्रमाण कमी झाल्याने शरीरातील केमिकल्सला बाहेर टाकले जाते. यामध्ये वजन कमी तेव्हाच शक्य आहे जेव्हा व्यक्ती कठोरपणे नियम पाळते. ही पद्धत अवलंबण्यास सुरुवात केल्यानंतर रोज किती कॅलरीचा आहार आपण घेत आहोत याकडे लक्ष द्यायला हवे. ताजी फळे, भाज्या, मासे, मटन, तांदूळ आदी खावे. तर केक, मिठाई, चॉकलेट, फॅटयुक्त पदार्थ व अल्कोहोल घेऊ नये. हा वजन कमी करण्याचा योग्य पर्याय आहे. रोज कमी प्रमाण असलेल्या कॅलरीजचे पदार्थ आपल्या आहारात घेतल्याने खात्रीशीर परिणाम होतो.
कमी चरबीयुक्त आहार
या डाएट प्रकारात पिष्टमय पदार्थ व साखरेचे प्रमाण कमी केले जाते. चरबीयुक्त पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करण्यास सांगितले जाते. ऑलिव्ह ऑइल, चीज, अंडी व रेड मटन खावे. फळे, पास्ता, तांदूळ, पाव व शीतपेये घेवू नयेत. साधारणत: इतर डाएटमध्ये जो आहार टाळण्यास सांगितला जातो, तो आहार या प्रकारात घेण्यास सांगितले जाते. वजन कमी करण्याची ही वेगळी पद्धत आहे. यामध्येही वजन हळूहळू कमी होते. जास्त दिवस हा डाएट पाळल्यास व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो. फळे व भाज्या आहारात न घेतल्याने शरीरात पोषणतत्त्वे व खनिजांची कमतरता निर्माण होते.
व्हिटॅमिनयुक्त शाकाहारी आहार
या प्रकारात मांसाहार पूर्णपणे नाकारला गेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त प्रथिने असलेला आहार घेण्यास सांगितले जाते. पाव, तांदूळ, पास्ता, ताजी फळे व भाज्या खाव्यात. मांसाहार करू नये. व्हिटॅमिन जास्त मिळेल व चरबी कमी होईल. मात्र, यामध्ये प्रथिनांच्या समावेशाकडे जास्त लक्ष द्यायला हवे. दिवसभरात जे काही सेवन कराल त्यामध्ये प्रथिने जास्तच असली पाहिजेत.
मधुमेहासाठी आहार
यामध्ये कोणत्याही प्रकारचा आहार घेण्यास मनाई केली जात नाही. त्याचसोबत आहारामध्ये चांगल्या चरबीयुक्त पदार्थांसोबत प्रथिने घेण्यास सांगितले जाते. सर्व प्रकारचे धान्य, भुईमुगाच्या शेंगा, गाजर व दूध घ्यावे. व्हाइट ब्रेड, आलू व आयरप्स घेवू नये. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जास्त उपयुक्त आहे. कारण यामध्ये लो-शुगर अन्नाचा समावेश असतो.
वेळोवेळी जास्त भूक लागल्याची आठवण न होणे हे या प्रकाराचे वैशिष्ट्य आहे. त्याचसोबत शरीरातील ऊर्जा पातळीही वाढण्यास मदत होते. जीआयई या डायट प्रकाराचा अजून विशेष धोका समोर आलेला नाही. तज्ज्ञांच्या मते या पद्धतीचे पालन करणे खूप अवघड आहे. त्याकरिता व्यक्तीला सर्व पद्धत व नियम व्यवस्थित माहीत असायला हवेत.