आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही उघडझाप आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. यातून मोठे आजार उद्भवण्याची शक्यता असते. यावर मात करण्यासाठी उपाय करता येतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढली की आजार टाळणे सहज शक्य होते. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१) वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या, पावसात भिजू नका.
२) अर्धा चमचा सुंठ मधासोबत घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात. सांधेदुखी दूर होते.
३) लहान मुलांना गारठ्यापासून बचाव करण्यासाठी गरम कपडे द्या.
४) तुळशीची पाने, अद्रक पाण्यात उकळून चहाप्रमाणे प्यावे.
५) कोमट पाणी प्या.
६) कडूलिंबाची पाने वाटून त्यामध्ये गिलोय चूर्ण आणि आवळा चूर्ण मिसळा. या तिन्हींचा ताजा रस तयार करून सेवन करा.
७) पावसातून आल्यानंतर फॅन लावू नका.
८) उघड्यावरील खाद्यपदार्थ खावू नका.
९) बाहेर पडताना नाकाला रूमाल बांधा.