पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे आणि खराब पाण्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे आपल्याला पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घावी लागते. आपण आरोग्याची बाबतीत थोडा जरी निष्काळजीपणा केला. तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते .त्यामळे पावसाळ्यात कोणतेही पदार्थ खाताना विशेष काळजी घेणं महत्वाच आहे. तसेच फळ खातानाही आपण ती व्यवस्थित धुऊन घेतली पाहिजेत.
*फळे खाताना घ्या ही काळजी*
१) आपण बाजारातून स्टिकरचे फळे आणतो. स्टिकर लावलेले फळ चांगले असतात. हा आपला गैरसमज असतो. म्हणून आपण ती फळे न धुता खातो.परंतु ,असे कधीच करू नका. कोणतंही फळ खाताना धुवूनच खा.
२) पावसाळ्यात फळांमध्ये किडे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात ज्या फळांचा मोसम आहे.अशीच फळे खा.
३)पावसाळ्यात वादळ-वारे जास्त असतात. त्यामुळे झाडाची फळे गळून पडतात. आणि ती बाजारात विकायला आणतात. या फळांमध्ये पावसामुळे किडे पडतात. त्यामुळे फळे खरेदी करताना नीट पाहून घ्या.
४) आपण फळ कापतो. आणि ते पूर्ण खाल्लं नाही. तर तसेच ठेवतो. पण तस कधीच करू नका. आणि अशी कापलेली फळही फ्रिज मध्ये जास्त वेळ ठेऊ नका.
५) पावसाळ्यात बाहेरील ज्युस कधीच पिऊ नका.