आरोग्यनामा टीम – सध्या कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि यावर कोणतीच लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने स्वता:ची काळजी स्वता: घेणे आवश्यक आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. शरिर चांगले आणि हायड्रेड ठेवण्यासाठी पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिले जाते. यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी शरिरात गेलंच पाहिजे.
तुम्ही दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पित असाल पण पित असलेले पाणी योग्य पद्धतीने पित नसाल तर याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार हळूहळू पाणी प्यायला हवं. पटपट घोट घेत पाणी प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हा माहित असणे गरजेचे आहे.
काही लोक उभं राहून पाणी पितात. उभं राहून पाणी पिऊ नका कारण उभं राहून पाणि पिता त्यावेळी पोटाच्या खालच्या भागात पाणी जाते. त्यामुळे शरीराला पुरेश्या प्रमाणात पाणी मिळत नाही. तुम्ही उभं राहून पाणी पीत राहिला तर कालांतराने गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पाणी पिऊनही शरीर हायड्रेट राहत नाही. शक्य असल्यास बाटलीने पाणी पिणं टाळून ग्लासनं पाणी प्या. जर तुम्ही आजारी असाल तर जास्त पाणी प्या.
पाणी पिण्याची योग्य वेळ
सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवणाच्या अर्धा तास अगोदर पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यावर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यासाठी मदत मिळते. याशिवाय ऊर्जेतहीवाढ होते. भरपूर पाणी पिल्याने घाम आणि लघवीतून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतात. परिणामी किडनीच्या समस्या होत नाहीत.
गरम पाणी पिण्याचे फायदे
1. सकाळी लवकर उठून गरम पाणी पिल्याने पचनक्रिया संतुलीत राहते. जेवण लवकर आणि सहज पचतं.
2. सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीराचं वजन नियंत्रित राहतं.
3. वेळेच्या आधी म्हातारपण नको असेल तर रोज सकाळी गरम पाणी प्या.
4. सकाळी गरम पाणी पिल्याने कफ, वात आणि पित्तासारख्या समस्या होत नाहीत.
5. गरम पाणी आपल्या त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. गरम पाण्याने त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या दूर होतात.