आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अलिकडे स्त्री-पुरूष हे वयाच्या पन्नाशीतच वयस्कर दिसू लागतात. बदललेल्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. केस पांढरे होण, लवकर थकवा येणे, आरोग्याच्या तक्रारी, असा त्रास अकालीच जाणवू लागतो. काही परंपरागत नियमांचे पालन केल्यास पन्नाशीनंतरही तारुण्याचा अनुभव घेता येणे शक्य आहे.
तारूण्यासाठी हे लक्षात ठेवा
* सकाळी झोपेतून लवकर उठावे. स्वप्नदोष समस्येपासून दूर राहण्यासाठी सकाळी लवकर झोपेतून उठावे. कारण सामान्यतः स्वप्नदोष ब्रह्म मुहुर्तामध्येच होतो. तारुण्याचे रक्षण करण्यासाठी यावेळी झोपेतून उठण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरु आहे.
* उशीरा पचणारे खाद्यपदार्थ खाऊ नयेत. असे पदार्थ रोग उत्पन्न करतात तसेच तारुण्याचाही नाश करतात. या पदार्थांमुळे पचनक्रियेवर ताण पडतो. त्याचबरोबर जास्त तिखट, मसालेदार, चटपटीत आहाराचे सेवन जास्त करू नये.
* गरम-गरम चहा, दुध, कॉफी पिणे दातांसाठी हानिकारक आहे. याचप्रकारे जास्त थंड पेयसुद्धा दातांना इजा पोहचवू शकतात.
* पचनक्रिया स्वस्थ चांगली असेल तर जास्त काळ तरुण राहू शकता. यामुळे पचनक्रियेवर ताण पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. जेवण सावकाश आणि चावून-चावून करावे.
* खूप थकवा आल्यानंतर लगेच जेवण करू नये. तसेच खूप परिश्रम केल्यानंतरही लगेच जेवण करू नये. यामुळे जेवण योग्य पद्धतीने पचत नाही आणि यामुळे पोटाचे आजार निर्माण होऊ शकतात.
* अॅसीडिटीचा त्रास असेल तर योग्य उपचार अवश्य करावेत, कारण अधिकांश आजार हे यामुळेच निर्माण होतात. पोट साफ ठेवण्यासाठी त्रिफळा चूर्ण फायदेशीर ठरते.
* वेळच्यावेळी उपवास अवश्य करावेत, कारण ज्याप्रकारे जेवणामुळे भूक भागते त्याचप्रमाणे उपवासामुळे शरीरातील दोष नष्ट होतात. यामुळे तरुण राहण्यासाठी उपवासही आवश्यक आहे. फळांचे अधिक प्रमाणात सेवन करावे.
* दारू, सिगारेट, तंबाकू या व्यसनांपासून दूर राहावे, कारण यामुळे तारुण्याचा नाश होतो.
* दररोज घाम गाळणेही आवश्यक आहे. घामाच्या वाटे शरीरातील अवशिष्ट पदार्थ बाहेर पडतात. शरीराची शुद्धी होते आणि उर्जा मिळते. यामुळे तरुण राहण्यासाठी शारीरिक श्रम आवश्यक आहेत.
* प्राचीन परंपरेनुसार रात्री डाव्या कुशीवर झोपावे. दिवसा झोप घेणे शास्त्रामध्ये वज्र्य सांगण्यात आले आहे. परंतु दिवसा झोपायचे असल्यास उजव्या कुशीवर झोपावे. यामुळे आळसामध्ये वाढ होत नाही आणि शरीरात उर्जा कायम राहते.
* जास्त काळापर्यंत मल-मुत्र आवेगाला रोखून ठेवल्यास विविध प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात आणि विर्याचा नाश होतो.
* दररोज सकाळी व्यायाम, योगासन अवश्य करावे. शक्य असल्यास दररोज प्राणायाम आणि सूर्याला नमस्कार करावा.
* झोपण्यापूर्वी दुधाचे सेवन करताना दुध खूप उकळलेले नसावे. झोपण्यापूर्वी गरम दुध प्यायल्यास स्वप्नदोषाची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. यामुळे तारुण्याचा नाश होतो.
* दररोज स्नान करण्यापूर्वी स्वच्छ टॉवेलने शरीर घासावे, यामुळे शरीरात विद्युतशक्ती उत्पन्न होईल. या उपायाने शारीरिक रोगांशी लढण्याची शक्ती मिळते.
* तरुण राहण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका पाण्याची आहे. यामुळे दिवसभरामध्ये शरीराला हवे एवढे पर्याप्त पाणी प्यावे. परंतु जेवण करण्यापूर्वी पाणी पिऊ नये. जेवण करत असताना थोडे पाणी पिऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पिणे फायदेशीर राहते.
* रात्रीच्या वेळी दिवसापेक्षा कमी आहार घ्यावा. रात्री हलके आणि सहजतने पचेल असा आहर घ्यावा. जेवणातील पदार्थ खूप गरमही नसावेत.