आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हिवाळा ऋतु सुरु होताच लोक थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी स्वेटर, सॉक्स, टोपी अशाप्रकारचे गरम कपडे खरेदी करतात. त्याचबरोबर थंडीच्या दिवसात लोकांना गरम पाण्याने अंघोळ करायला खूप आवडते. अंगाला बोचणारी थंडी पळविण्यासाठी लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. लोकांना असे वाटते गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्यांचा थकवा दूर होतो. थकवा दूर होताना तुम्हा याचा विचार केला का की गरम पाण्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. जेव्हा आपण गरम पाण्याने अंघोळ करतो तेव्हा गरम पाण्याचे तापमान 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत असणं गरजेचे असते. जर त्याहून जास्त कडक गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा आणि केसांना हानी पोहचू शकते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने कसे होऊ शकते आपले नुकसान याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.
1. जास्त तापमान असलेल्या गरम पाण्याने अंघोळ करणे त्वचेसाठी हानीकारक असते. त्यामुळे त्वचा लाल होते आणि अंगावर रॅशेज किंवा एलर्जी होऊ शकते.
2. गरम पाण्यामुळे त्वचेवरील मुलायमपणा कमी होऊन त्वचा ड्राय पडते आणि त्वचेला खाज येण्यास सुरुवात होते. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी कोमट पाण्याने अंघोळ करावी.
3. जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्किनवरील टिशूजला नुकसान पोहचते ते डॅमेज होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचेवर वयाच्या आधी सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते.
4. गरम पाण्याने अंघोळ केल्याने डोळ्यातील ओलावा देखील कमी होतो. यामुळे डोळ्यात लालसरपणा, खाज आणि डोळ्यतून वारंवार पाणी येण्याच्या समस्या उद्भवतात.
5. संशोधनानुसार, गरम पाण्याने अंघोळ केल्यास पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
6. गरम पाण्याचा वाईट परिणाम हा हात आणि पायांवर देखील होतो. कडक गरम पाण्यामुळे नखं तुटणे, इंफेक्शन आणि नखांच्या बाजूची स्किन निघणे यासारखे प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते.
गरम पाण्याचा केसांवर परिणाम
1. गरम पाण्याने केस धुतल्यास केसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे केसांचे मॉश्चरायजर कमी होते. केस रुक्ष आणि कोरडे दिसायला लागतात.
2. डोकं जर गरम पाण्याने धुतले तर टाळू कोरडी पडते त्यामुळे कोंड्याच्या समस्या उद्भवतात व केस गळण्याल सुरुवात होते.
Visit : arogyanama.com