आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या धापवपळीच्या जीवनात अनेकांच वजन वाढत आहे. ते कमी करण्यासाठी अनेक जण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रात्री जेवण केल्यानंतर वजन वाढेल या भीतीने अनेक जण रात्रीच जेवण टाळतात. पण असे केल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अजून वजन वाढेल या भीतीने जर तुम्ही रात्री जेवण करत नसाल तर सावधान.
१) आपल्या शरीराचे काम सुरळीत चालण्यासाठी शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते. हे पोषक तत्व आपल्याला आहारातून मिळत असतात. आणि आपण जर योग्य वेळेला योग्य आहार घेतला नाही तर आपल्या शरीराची वाढ खुंटते. आणि शरीराच्या यंत्रणेत बिघाड होतो.
२) रात्री जेवण केलं नाही. शरीराच्या कामकाजात बिघाड होतो. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होते.
३) रात्री व्यवस्थित जेवण न केल्यामुळे थायरॉईड सारख्या रोगांचा धोका अधिक असतो. तसेच याचा आपल्या शरीरातील हार्मोन्सवरही परिणाम होतो.
४) रात्री जेवण केलं नाही. तर आपण निरोगी राहू शकत नाही. अनेक आजार आपल्याला विळखा घालतात. त्यामुळे रात्रीचे जेवण हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.