आरोग्यानामा ऑनलाइन टीम – मानसिक तणाव हा विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरतो. यासाठी माणसाने कायम तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात मनशांती मिळणे अवघड असले तरी त्यासाठी काहीच प्रयत्न न करणे जास्त धोकादायक ठरू शकते. तणावामुळे नवनवीन समस्या शरीरात निर्माण होतात.
तसेच जुन्या आरोग्य समस्या आणखी त्रासदायक होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगासने, ध्यान धारणा आणि श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. तणाव हो आरोग्यासाठी खूप घातक आहे.सतत ताण राहिल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मायग्रेनने ग्रस्त असणारांसाठी तणाव जास्त त्रासदायक ठरू शकतो. स्नायू आणि सांधेदुखीसाठी जबाबदार असलेल्या कारणांपैकी तणाव घेणे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण असू शकते.
यामुळे छातीत वेदना होतात. तणावामुळे हृदयरोगांनाही निमंत्रण मिळते. त्यामुळे मनुष्यासाठी तणाव खूप घातक ठरत आहे. तणावावर योग्य नियंत्रण न ठेवल्यास अनिद्रेचा त्रास होऊ शकतो. तणावाने घेरल्यामुळे वारंवार झोप मोडते होते. शिवाय, यामुळे पूर्ण झोप मिळत नाही. शिवाय भूक कमी-जास्त होते. अनेकजणांची भूक कमी होते आणि वजन घटते. तर काही जणांची भूक अचानक वाढते. हे लोक अनहेल्दी फूडचे सेवन करू लागतात. पाठदुखीने त्रस्त असणारांचा त्रास तणावामुळे आणखी वाढतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.