आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | पाण्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते. अनेक आजार दूर ठेवण्यासाठी पाणी पिणे खुप आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज 6 ते 10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. परंतु हे आवश्यक नाही की, सर्व लोकांच्या शरीराला समान मात्रेत पाण्याची आवश्यकता भासली पाहिजे, कारण हे तुमच्या डाएटवर सुद्धा अवलंबून आहे. परंतु काही वस्तू अशा असतात ज्या खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. यामुळे रिअॅक्शन किंवा आजारी पडू शकता (Health News).
‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने आपले डोळे ठेवा निरोगी आणि सुंदर !
1. खरबूज किंवा कलिंगड खाल्ल्यानंतर
खरबूज आणि कलिंगड खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. यामुळे पोटात गडबड होऊ शकते. सोबतच अॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.
2. काकडी खाल्ल्यानंतर
काकडी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास जीआय हालचाल वाढेल. यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होईल. ज्यामुळे डायरिया, अतिसारची समस्या होऊ शकतो.
Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या
3. भाजलेले चने खाल्ल्यानंतर
भाजलेले चने खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटदुखीची समस्या होऊ शकते. कारण चने पचवण्यासाठी आपल्या शरीराला तीक्ष्ण पाचकाग्नी किंवा जठराग्नीची आवश्यकता असते. पण पाणी प्यायल्याने हा आग्नी शांत होतो. यामुळे चने पचन होत नाहीत. पचन डिस्टर्ब होते आणि पोटात दुखते.
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
4. शेंगदाणे खाल्ल्यानंतर
शंगदाण्याचा प्रभाव गरम आहे. तसेच याचा गुण कोरडा असतो. ज्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची इच्छा जास्त होते. असे केल्याने खोकल्याची समस्या होऊ शकते. काही वेळानंतर पाणी प्या.
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
5. गरम दूध किंवा चहानंतर
गरम पेय पदार्थ जसे की गरम दूध किंवा चहानंतर पाणी पिऊ नये. यामुळे नाकातून रक्त येण्याची समस्या सुद्धा होऊ शकते.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
6. गरम जेवणानंतर
गरम जेवणानंतर किंवा खुपच गरम जेवण असेल तर अजिबात पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रिया बिघडते. जेवणातील पोषकतत्व शोषण करण्यासाठी शरीराला वेळ दिला पाहिजे. 30 मिनिटानंतर पाणी प्या.
दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या
7. आयस्क्रीम खाल्ल्यानंतर
आयस्क्रीम खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये. यामुळे घसा खराब होऊ शकतो. 10 मिनिटानंतर पाणी प्या.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘हे’ 7 फायदे मिळवण्यासाठी आवश्य करा पुदीन्याचा उपयोग, जाणून घ्या