आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जीवन एवढे गतीमान झाले आहे की, अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ मिळत नाही. मुळात आरोग्य हे सर्वात अमुल्य असूनही वेळेअभावी त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण हे दुर्लक्ष काही वेळा धोकादायक ठरू शकते. आरोग्यासाठी काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली तरी चांगले आरोग्य मिळू शकते. चांगल्या आरोग्यासाठी कोणती दक्षता घ्यावी, याविषयी जाणून घेवूयात.
अनेकवेळा संगणकाचा की बोर्ड, मोबाइल स्क्रीनवर जास्त प्रमाणात किटाणू असतात. ज्यामुळे आजारपण येऊ शकते. गॅजेट्सचा वापर केल्यानंतर हात न धुतल्याने बहुतांश लोकांना पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होतो. दुसरे म्हणजे तणावामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. म्हणून तणाव टाळणे आरोग्यासाठी चांगले आहे. ४९ टक्के अमेरिकन नागरिक आयुष्यात कधी ना कधी तणावग्रस्त राहिलेले आहेत. यामुळे त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारसारख्या आजारांचा सामना करावा लागला आहे.
जे लोक सकाळी नाष्टा करत नाही त्यांना दिवसभर उर्जेची कमतरता भासते, असे संशोधनात आढळून आले आहे. सकाळी उठल्यानंतर शरीराला रात्रभराच्या कमी हालचालीनंतर देखील जास्त कॅलरीजची गरज असते. अशास्थितीत सकाळी नाष्टा न केल्यास शरीराला थकवा जाणवू लागतो. विपरीत स्थितीत जास्त भावनाशील होत प्रतिक्रिया देणेदेखील आरोग्यासाठी नुकसानकारक असते. एखाद्या गोष्टीवर जास्त रिअॅक्ट झाल्याने अचानक तणाव वाढून रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. ओवर रिअक्ट झाल्याने रक्तदाब सुद्धा वाढतो. हे शरीरासाठी हानिकारक आहे.
३० व्या वर्षानंतर प्रत्येकाने व्यायाम करावा. यामुळे फुप्फुसाला योग्य पद्धतीने काम करण्यास मदत मिळते. शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होते. सोबत रक्त प्रवाहदेखील नियंत्रित राहतो. दररोज व्यायामासाठी वेळ काढता येत नसल्यास आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस तरी व्यायाम करावा, असे तज्ज्ञ सांगतात.