आरोग्यनामा ऑनलाईन टीम – श्रावण महिन्यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कारण ह्या मोसमात इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. तसेच या महिन्यात पचनशक्ती कमजोर झालेली असते. त्यामुळे मांसाहार , जड आणि तळलेले पदार्थ टाळावेत. आयुर्वेदाच्या नियमानुसार ऋतूनुसार आहार असावा. आयुर्वेदात श्रावण महिन्यात सात्विक खाद्य पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.तर काही पदार्थ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. जाणून घ्या श्रावणात कोणते पदार्थ खाणे टाळावेत याविषयी
मांसाहार
पावसाळ्यात पचनतंत्र कमजोर झालेले असते. त्यामुळे श्रावणात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा.
तेलकट आणि तळलेले पदार्थ –
श्रावण महिन्यातील वातावरणात पाचनशक्ती कमजोर राहते. जास्त जड, तेलकट आणि तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
थंड पदार्थ –
या महिन्यात वातावरणात सर्वत्र गारवा पसरलेला असतो त्यामुळे शक्यतो थंड पदार्थ खाणे टाळावेत.
पालेभाज्या
श्रावण महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांमधील जीवाणू , बॅक्टेरिया आणि वर्म्सदेखील वाढतात. ज्यामुळे पोटदुखी आणि इतर तक्रारी होण्याची शक्यता असते. तसेच वाताची समस्या उद्भवते.
दूध
श्रावणात दूध प्यायल्यास पित्त वाढते. या वातावरणात दूध प्यायल्याने गॅस आणि पोटदुखीचा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
वांगी
पावसाळ्यात वांग्याला किड जास्त लागते. पचनशक्ती कमजोर झाल्यामुळे वांग्यांमुळे गॅस तयार होण्याची शक्यता जास्त असते.
दही –
दही असल्यामुळे सर्दी-पडसे, गळ्याशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे दही खाऊ नये.