पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यसाठी पालेभाज्या खा. असे आहार तज्ञ सांगतात. कारण पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सगळ्या भाज्या या आरोग्यासाठी उपयुक्त तर आहेतच. परंतु पालकभाजीमध्ये भरपूर प्रमाणात आर्यन असत. आणि पालकभाजी अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे आपल्या आहारात पालकभाजीचा उपयोग करणे गरजेचे आहे.
* पालक भाजीचे फायदे खालीलप्रमाणे *
१) पालकभाजी ही आपल्या मेंदूच कार्य सुरळीत करते. त्यामुळे मेंदूचे कोणतेही आजार टाळायचे असतील. तर ही अत्यंत फायदेशीर आहे.
२) ही भाजी गर्भवती महिलांसाठी चांगली असते. कारण या भाजीत भरपूर प्रमाणात न्युट्रिशियन असतात. हे गर्भाची चांगली वाढ होण्यास होण्यास मदत करतात.
३) पालकभाजीत भरपूर प्रमाणात आयर्न असते. हे आयर्न आपल्याला ऍनिमियापासून दूर ठेवतात.
४) मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे.
५) पालकभाजीमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. फायबर हे पचनक्रिया सुधारते.
६) डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी ही अतिशय फायदेशीर आहे.