आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून खिचडी तयार केली जाते. यामध्ये भाज्या, मसाले, तुप या सर्वांचा चवीनुसार वापर केला जातो. शेकडो वर्षांपासून भारतात खिचडी खाल्ली जात आहे. खिचडी हा शब्द संस्कृतमधील खिच्चा या शब्दातून आला असे म्हटले जाते. मुगलकाळात खिचडी खुप प्रसिध्द डिश होती. १६ व्या शतकामध्ये मुगल बादशहा अकबर वजीर अबुल फजलने लिहिलेल्या दस्तऐवजात विविध प्रकारे खिचडी बनवण्याच्या रेसिपीचा उल्लेख आढळतो.
भारतासोबतच मध्य पूर्व देश, अनेक आफ्रीकन देश, मोरक्को, इजिप्त सारख्या देशांमध्ये खिचडी खुप प्रसिध्द आहे. येथे विविध पध्दतींनी खिचडी बनवली जाते. खिचडीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या देशांमध्ये खिचडीत मांस मिसळले जाते.
खिचडीत फायदे
१ भरपूर न्यूट्रिशन्स मिळतात
२ इनडायजेनशपासून होतो बचाव
३ वजन कमी करण्यात होते मदत
४ डायबिटीजपासून बचाव होतो
५ वात, पित्त आणि कफपासून बचाव होतो
६ बॉडी डिटॉक्स होते
७ स्किन हेल्दी आणि ग्लोइंग होते