आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कारल्याच्या भाजीच नाव घेतलं की अनेकांची तोंडे वाकडी होतात. कारण कारलं हे चवीला कडू असत. त्यामुळे आपण त्याचा आहारात समावेश करत नाही. पण कारलं हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. कारल्याच्या सेवनाने आपले विविध आजार किमी होतात. त्यामुळं आपण कारल्याचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
हे आजार बरे होण्यासाठी खावे कारले :
१) त्वचारोग :
दाद, खरुज, सोरॉसिस यांसारख्या त्वचा रोगांवर कारल्याचा रसात लिंबाचा रस घालून पिणे लाभदायी ठरते.
२) डायरिया:
यकृतासंबंधी आजार असतील तर कारल्याच्या रसात थोडेसे पाणी आणि काळे मीठ घालून त्याचे सेवन करा. अर्धा कप पाण्यात एक दोन चमचे कारल्याचा रस घालून पिल्यास डायरियावर फायदा होईल.
३) किडनी स्टोन :
तुम्हाला जर किडनी स्टोनचा त्रास असेल तर कारल्याचा रस पिणे किंवा कारल्याची भाजी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे स्टोनची समस्या कमी होण्यास मदत होते.
४) लठ्ठपणा :
कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस घालून रोज सकाळी २ महिन्यांपर्यंत सेवन केल्यास शरीरात तयार होणारे टॉक्सिन्स दूर होतात. आणि जाडेपणा कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपले पचनतंत्र सुधारते आणि सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते.
५) भूक लागणे :
कमी भूक लागत असल्यास कारल्याचे सेवन करा. कारल्याच्या सेवनाने भूक वाढीस मदत होते. भूक न लागल्यामुळे नीटसे खाल्ले जात नाही. त्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. परिणामी स्वास्थ्यासंबंधिचे अनेक समस्या सुरू होतात. यावर कारल्याचा रस घेणे किंवा भाजी खाणे उपयुक्त ठरते.