आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदात तुपाला खुप महत्व आहे. विविध औषधांमध्ये तुपाचा वापर केला जातो. यासाठी गायीच्या तुपाचाच वापर करण्यात येतो. शिवाय, तुप विविध खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. तुपामुळे शारीरीक ताकद वाढते तसेच आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. गायीच्या तुपाचे २ थेंब नाकात टाकल्याने कोणते फायदे होतात, हे आपण जाणून घेणार आहोत.
या समस्या होतात दूर
१ केस गळणे थांबते. नवे केस येतात.
२ अॅलर्जीची समस्या दूर होते.
३ मायग्रेनची समस्या कमी होते.
४ स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
५ नाकाचा कोरडेपणा दूर होतो.
* हा उपाय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.