आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नियमित अनवाणी पायाने चालण्याने शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात असलेली इलेक्ट्रिक एनर्जी अनवाणी पायामुळे जमिनीच्या संपर्कात येते, यामुळे जमिनीची इलेक्ट्रिक एनर्जी शरीरात जाते, असे म्हटले जाते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. व्यक्ती विविध आजारापासून दूर राहते. सकाळी १५ मिनिटे नियमित अनवाणी पायाने चालल्यास होणारे फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे –
१) हृदयरोगाचा धोका टळतो.
२) डोकेदुखीची समस्या दूर होते.
३) उर्जा पातळी वाढते.
४) वजन नियंत्रणात राहते.
५) हाडे मजबूत होतात.
६) मसल्स पेन कमी होतो.
७) जॉइंट पेन पासून आराम मिळतो.
८) उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.
९) ताणतणाव कमी होतो.
१०) झोप न येण्याची समस्या दूर होते.