आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदाम आकाराने लहान दिसतात; परंतु त्यामध्ये पौष्टिक पदार्थ भरपूर असतात. आयुर्वेदात देखील बदाम त्यातील गुणधर्मांमुळे खूप फायदेशीर मानले गेले आहेत. आपल्या वडिलधाऱ्यांनी नेहमीच बदाम खाण्याचा सल्ला दिला आला आहे. त्यांचे म्हणणे आहे की बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि शारीरिक आणि मानसिक समस्यांना देखील मदत होते. कॅलिफोर्नियाच्या बदाम मंडळाच्या नोंदणीकृत आहारतज्ज्ञ जेनी हिप म्हणतात, की बदामांचा हृदय आरोग्य, मधुमेह आणि वजन यांच्याबद्दल विस्तृत अभ्यास केला गेला आहे. यात प्रथिने, फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम यासारखे महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात. म्हणून, या सेवनाने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्याचे दिवस येत असल्याने बदामाचे सेवन करण्याचे फायदे आणि तोटे तसेच उन्हाळ्यात बदाम खावे की नाही हे जाणून घेऊया?
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
बदाम हृदय निरोगी करते
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार बदामांचे सेवन हृदय निरोगी ठेवण्यासाठी करता येते. त्याचे सेवन केल्यास एलडीएल-सी (कमी घनतेचे लिपोप्रोटिन कोलेस्ट्रॉल) कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे उच्च घनतेचे लिपोप्रोटिन कोलेस्ट्रॉल (एचडीएल-सी) संतुलित करण्यास देखील मदत होते.
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
बदाम वजन कमी करण्यास देखील मदत करते
बदाम वजन कमी करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशनमध्ये प्रकाशित झालेल्या वैज्ञानिक संशोधनात असे म्हटले आहे की कमी कॅलरीयुक्त आहारात बदामांचा वापर वजन कमी करण्यासाठी जाऊ शकतो. अभ्यासानुसार, बदामाचे सेवन करणाऱ्यांचे वजन २४ आठवड्यांनंतरच कमी झाले असल्याचे दिसून आले.
उन्हाळ्यात बदाम खावे की नाही?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की जर तुम्ही पाण्यात भिजलेले बदाम खाल्ले तर आपण उन्हाळ्यामध्येही त्याचे सेवन करू शकतो. वास्तविक, भिजवलेले बदाम पचन तंत्रासाठी चांगले मानले जातात; कारण भिजलेले बदाम पचायला सोपे असतात. याच्या वापरामुळे बद्धकोष्ठतेच्या लक्षणांमध्ये आराम मिळतो आणि अपचनचा त्रासही होत नाही.
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
उन्हाळ्यात बदाम अधिक खाण्याचे नुकसान
कोणत्याही गोष्टीचा अति प्रमाणात सेवन हानिकारक आहे आणि बदामाचा प्रभाव जास्त असल्याने उन्हाळ्यात ते कमी केले पाहिजे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते आणि यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा