आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आयुर्वेदात नारळपाण्याला खूप महत्त्व आहे. नियमित एक नारळपाणी प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. नारळाचे पाणी कर्बोदकाचा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. नारळात जीवनसत्त्वे ब आणि क मुबलक प्रमाणात असते.नारळ पाण्यामध्ये विषारी तत्व दूर करण्याचे गुण असतात.
नारळपाणी पिण्याचे फायदे –
सकाळच्या वेळेस नारळपाणी घेतल्याने थायरॉईड हार्मोन्स नियंत्रित राहतात.
नारळपाण्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात. नारळपाणी प्यायल्याने खूप वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
नारळपाणी प्यायल्याने त्वचेमध्ये ओलावा कायम राहतो. त्वचा नितळ राहते.
जुलाब आणि शरीराची आग होत असेल किंवा त्वचा कोरडी होत असेल तर नारळपाणी प्यावे.
शरीरात पाण्याची कमतरता, पोटाचे आजार, स्ट्रोक, हायपरटेंशन, किडनी स्टोन यांसारख्या आजारांवर नारळाचे पाणी फायदेशीर ठरते.