आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भरपूर पाणी प्यायल्याने आरोग्य चांगले राहते, असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे असे तज्ज्ञ सांगतात. कारण पाण्याच्या मदतीने आपले शरीर विषारी घटक बाहेर टाकते. डॉक्टरसुद्धा नेहमी जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे पचन क्रिया, त्वचा आणि केस मजबूत होण्यास मदत होते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास नुकसान देखील होऊ शकते. पाण्याचे फायदे आणि नुकसान याबाबत माहिती घेवूयात.
पाणी पिण्याचे १० फायदे
* वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी प्यावे.
* पाणी पिण्याने जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
* मेंदू ९० टक्के पाण्याने तयार झालेला असतो. कमी पाणी पिल्याने डोके दुखू शकते.
* पाण्याने ज्यॉइट्सचा त्रास कमी होतो.
* शरीरातील मांसपेशींचा ८० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. त्या मजबूत करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
* सकाळी उठल्यानंतर १ ग्लास पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होते. त्वचा कोरडी पडत नाही.
* सकाळी उठल्यानंतर गरम अथवा कोमट पाण्यात मध आणि लिबू टाकून प्यावे. यामुळे टॉक्सिक एलिमेंट शरीरातून बाहेर पडतात. इम्यून सिस्टिम उत्तम राहते.
पाणी पिण्याचे १० तोटे
* जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने फॅट वाढते.
* खरबूज, काकडी खाल्यानतर लगेच पाणी पिऊ नये. सर्दी होण्याची दाट शक्यता असते.
* जास्त पाणी पिल्याने जेवण पचण्यास उशीर लागू शकतो.
* काहींना पाणी पिल्याने जळजळ होण्याचा त्रास असतो.
* उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.
* प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिल्याने किडनीवर अतिरिक्त दबाव पडू शकतो.
* पाण्याच्या अति सेवनामुळे हृदयाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
* बायपास झालेल्या व्यक्तींनी पाणी कमी प्यावे.
* रिकाम्या पोटी पाणी पिल्यास सर्दी-ताप होण्याची भिती असते.
हे त्रास असल्यास पाणी योग्यप्रमाणात प्यावे
* ताप आल्यास
* जास्त काम केल्यास
* अधून मधून पाणी पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थीत राहण्यास मदत होते.
* केस गळत असल्यास
* तणाव आल्यास
* त्वचेवर तारुण्य पिटीका आल्यास
* त्वचेवर फंगस, खाज येत असल्यास
* यूरिन इन्फेक्शन झाल्यावर
* पाण्याची कमतरता
असे प्या पाणी
पाणी १० मिनिटे उकळून गार करुन तहान लागल्यानतर पित राहावे. पाणी उकळताना त्यात आल्याचा एक तुकडा टाकल्यास फायदा होतो. उकळून गार केलेल्या पाण्यामुळे कफ आणि पित्ताचा त्रास कमी होतो. उकळून गार केलेले पाणी एका दिवसानंतर फेकून द्यावे. कोमट पाणी पिल्याने पित्त आणि कफ दोष होत नाही.