आरोग्यनामा ऑनलाईन टीम – उन्हाळ्यात डिहायड्रेटची समस्या सर्वाधिक जाणवते. वाढलेले तापमान, मोठ्या प्रमाणात येणारा घाम यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेटचा त्रास वाढतो. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होत असले तरी आणखी अशीही कारणे आहेत ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनेमुळेही शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. तसेच अल्कोहोलमुळेही डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशनशिवाय अल्कोहोलमुळे फॅटी लिव्हर, मधुमेह आणि हृदयाचे आजार होतात. गोड पदार्थ खाल्ल्यानेही शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. रक्तात साखरेची पातळी जास्त झाल्यास किडनी जास्त युरिनची निर्मिती करते. आणि वारंवार लघवीला गेल्याने शरीरातील पाणी कमी होते. मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते.