आरोग्यनामा ऑनलाईन टीम- आले हे जेवणात वापरले जाते. आल्यात औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदात आल्याला खूप महत्व आहे. आल्याचे पाणी नियमित पिल्याने अनेक आजार टाळता येतात. आल्यात अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इंफ्लेमेटरी घटक आहेत. हे घटक शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
एक कप पाण्यात आल्याचा एक लहान तुकडा टाकून ५ मिनिटे उकळवा. गार झाल्यानंतर त्याचे सेवन करा. आल्यामध्ये अँटी कँसर प्रॉपर्टीज असतात. आल्याचे पाणी पिल्याने फुफ्फुस, प्रोस्टेट, ओवेरियन, कोलोन, ब्रेस्ट, त्वचा आणि पेन्क्रिएटिक कँसरपासून बचाव होतो, असे काही तज्ज्ञ सांगातात. आल्याचे पाणी पिल्याने मेंदूच्या पेशी सैल होतात होतात. यामुळे डोकेदुखीची समस्या बऱ्याच अंशी कमी होते. नियमित आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. यामुळे रक्त शुद्ध होते आणि पिंपल्स, स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो. आल्याचे पाणी पिल्याने शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढते. यामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका टळतो. आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात. त्याचे पाणी पिल्याने घशात अजिबात कफ तयार होत नाही आणि खोकला येत नाही.
जेवणाच्या २० मिनिटानंतर एक कप आल्याचे पाणी प्यावे. हे शरारीमध्ये अॅसिडचे प्रमाण नियंत्रित करते. यामुळे छातीतील जळजळ दूर होते. आल्याचे पाणी शरीरामध्ये पाचक रस वाढवते. यामुळे जेवण लवकर पचते आणि शरीराची पचनक्रियाही सुधारते. आल्याचे पाणी पिल्याने शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते. अशा वेळी फॅट लवकर जळतात आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. नियमित आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणाता राहते. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी असते. आल्याचे पाणी पिल्याने शरीराचा रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे स्नायू सैल होतात आणि स्नायूमधील वेदनाही दूर होतात.